शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

निसर्ग उद्यानाच्या आश्वासनाला मूठमाती, मार्बल उद्योजकांवर अत्यल्प दरात भूखंडाची मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:46 IST

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे.

- मुरलीधर भवार ।डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून या भूखंड वाटपाची चौकशी करण्याची मागणी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.निवासी परिसरातील असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडीक, रश्मी येवले यांनी याबाबत तक्रार केली आहे. असोशिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. २७ गावे व औद्योगिक निवासी परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला व पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. त्या दरम्यानच्या काळात उस्मा पेट्रोल पंपानजीक असलेल्या या मोकळ््या भूखंडावर कचरा टाकला जात होता. बेकायदेशीर डंपिंग ग्राऊंडला नागरीकांनी तीव्र विरोध केला. पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसल्याने कल्याण बदलापूर कारखानदार संघटनेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल नागरीकांच्या बाजूने लागला आणि डंपिंग ग्राऊंड बंद झाले. त्या जागेवर निसर्ग उद्यान सुरु करण्याचे गाजर एमआयडीसीने नागरीकांना दाखवले. कामाच्या प्रगतीबाबत माहितीच्या अधिकारात नलावडे यांनी एमआयडीसीकडे विचारणा केली असता हा भूखंड चार मार्बल उद्योजकांना देण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या भूखंडाचा वाणिज्य दर हा प्रति चौरस मीटर ३९ हजार ७०० रुपये इतका आहे तर औद्योगिक दर १२ हजार ३२० रुपये आहे. वाणिज्य दराने हा भूखंड न देता एमआयडीसीचे अधिकारी औद्योगिक दराने भूखंड देत मार्बल उद्योजकांवर मेहरनजर दाखवत असल्याचा आरोप वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. एकूण ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडापैकी तीन मार्बल उद्योजकांना प्रत्येकी तीन हजार चौरस मीटर व एका उद्योजकास दोन हजार चौरस मीटर भूखंड दिला जाणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी येत्या १५ दिवसात खुलासा केला नाही तर आंदोलन करुन न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.नागरीकांनी केलेले आंदोलन व न्यायालयीन याचिकेनंतर भूखंडावरील बेकायदा डंपिंग ग्राऊंड हटले. तोपर्यंत एमआयडीसी मूग गिळून बसली होता. भूखंड मोकळा होताच त्याच्या व्यवहारासाठी पुढे सरसावली असून लोकांना निसर्ग उद्यानाच्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. एमआयडीसीचे हे वर्तन दुटप्पी असल्याने निषेधार्ह आहे. - राजू नलावडे,माहिती अधिकार कार्यकर्ता