शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

निसर्ग उद्यानाच्या आश्वासनाला मूठमाती, मार्बल उद्योजकांवर अत्यल्प दरात भूखंडाची मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:46 IST

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे.

- मुरलीधर भवार ।डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून या भूखंड वाटपाची चौकशी करण्याची मागणी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.निवासी परिसरातील असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडीक, रश्मी येवले यांनी याबाबत तक्रार केली आहे. असोशिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. २७ गावे व औद्योगिक निवासी परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला व पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. त्या दरम्यानच्या काळात उस्मा पेट्रोल पंपानजीक असलेल्या या मोकळ््या भूखंडावर कचरा टाकला जात होता. बेकायदेशीर डंपिंग ग्राऊंडला नागरीकांनी तीव्र विरोध केला. पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसल्याने कल्याण बदलापूर कारखानदार संघटनेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल नागरीकांच्या बाजूने लागला आणि डंपिंग ग्राऊंड बंद झाले. त्या जागेवर निसर्ग उद्यान सुरु करण्याचे गाजर एमआयडीसीने नागरीकांना दाखवले. कामाच्या प्रगतीबाबत माहितीच्या अधिकारात नलावडे यांनी एमआयडीसीकडे विचारणा केली असता हा भूखंड चार मार्बल उद्योजकांना देण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या भूखंडाचा वाणिज्य दर हा प्रति चौरस मीटर ३९ हजार ७०० रुपये इतका आहे तर औद्योगिक दर १२ हजार ३२० रुपये आहे. वाणिज्य दराने हा भूखंड न देता एमआयडीसीचे अधिकारी औद्योगिक दराने भूखंड देत मार्बल उद्योजकांवर मेहरनजर दाखवत असल्याचा आरोप वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. एकूण ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडापैकी तीन मार्बल उद्योजकांना प्रत्येकी तीन हजार चौरस मीटर व एका उद्योजकास दोन हजार चौरस मीटर भूखंड दिला जाणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी येत्या १५ दिवसात खुलासा केला नाही तर आंदोलन करुन न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.नागरीकांनी केलेले आंदोलन व न्यायालयीन याचिकेनंतर भूखंडावरील बेकायदा डंपिंग ग्राऊंड हटले. तोपर्यंत एमआयडीसी मूग गिळून बसली होता. भूखंड मोकळा होताच त्याच्या व्यवहारासाठी पुढे सरसावली असून लोकांना निसर्ग उद्यानाच्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. एमआयडीसीचे हे वर्तन दुटप्पी असल्याने निषेधार्ह आहे. - राजू नलावडे,माहिती अधिकार कार्यकर्ता