शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करा- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

By अजित मांडके | Updated: June 14, 2023 20:42 IST

बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

ठाणे : सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये जून अखेर पर्यंत पुरेल इतका पाणी साठ आहे. त्यामुळे कोणतीही पाणी कपात होणार नाही. मात्र, पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी टँकरची व्यवस्था तयार ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

यंदाच्या वर्षी पाऊस लांबला असल्याने जिल्ह्यातील जल साठ्यांच्या स्थितीची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. यावेळी जिल्ह्यात जून अखेर पर्यंत पाणी साठ पुरेल इतका आहे. त्यात पाऊस लांबल्यास पाण्याची स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची परस्थिती निर्माण झाल्यास जिल्हातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पर्यायी टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. 

वादळ, अतिवृष्टी झाली, दरड कोसळल्या नंतर लगेचच तेथील परस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करणे या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. महिला बचत गटांच्या संख्या वाढविणे महिला बचत गट प्रक्रियेमध्ये ज्या महिला अद्याप आलेल्या नाहीत, अशा महिलांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करून वेगवेगळी उपक्रम राबविणे, त्यात महिला बचत गटाचे सहकार्य वाढवणे ते काम महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र करण्याचे नियोजन करावे असे देखील देसाई यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील खर्चाचे नियोजन या ठिकाणी केले आहे. वेळोवेळी कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे, इथून पुढे सुद्धा ज्या वेळेला आवश्यकता वाटेल तेव्हा आढावा घेऊन जिल्हा नियोजनचा सगळा १०० टक्के वेळेत कसा खर्च होईल, कामे वेळेत कशी सुरु होतील ? वेळेत कशी पूर्ण होतील, दर्जेदार कशी होतील या सगळ्या गोष्टींकडे पालकमंत्री म्हणून माझे लक्ष असणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मी हरवलो नाही...पालकमंत्री हरवले असल्याचे फलक जिल्ह्यातील काही ठिकाणी लावण्यात आल्याच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, मी कुठे हरवलो आहे, हरवलो असतो तर दिसलो नसतो, मी तर तुमच्या समोरच असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यात सरकार पडले राऊतांच्या या वक्तव्यावर संजय राऊत चुकीच्या चिठ्या काढतात, त्यामुळे महाविकास आघाडीने आता पोपट बदलायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला. शेखर बागडे बाबत विरोधी पक्षनेत्यांचे जे काही म्हणने असेल ते त्यांनी द्यावे त्यावर सरकार निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणेShambhuraj Desaiशंभूराज देसाई