शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मलनिस्सारण प्रकल्पांबाबत ५ मार्चपर्यंत कृती आराखडा द्या; आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:53 IST

न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बैठक

कल्याण : उल्हास व वालधुनी नदी प्रदूषणप्रकरणी नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने सोमवारी घेतलेल्या एका बैठकीत महापालिका हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प किती वेळेत पूर्ण होतील, ते कधी कार्यान्वित केले जातील, या विषयाचा कृती आराखडा ५ मार्चपर्यंत तयार करावा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण झाले नसल्याने मलमूत्र प्रक्रियेविना कल्याण खाडी, उल्हास व वालधुनी नदीत सोडले जात आहे. याप्रकरणी वनशक्ती या पर्यावरण संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारीला सुनावणी झाली. यावेळी महापालिका आयुक्तांनी स्वत: २५ मार्चच्या सुनावणीस हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच महापालिकेचे प्रकल्प रखडल्याने त्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यापार्श्वभूमीवर सूर्यवंशी यांनी घेतलेल्या बैठकीला उपायुक्त उमाकांत गायकवाड, ‘वनशक्ती’चे डी. स्टॅलीन, ‘निरी’चे शास्त्रज्ञ तुहीन बॅनर्जी, घनकचरा व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मलनिस्सारणचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.केडीएमसी हद्दीत १२३ दश लक्ष लीटर क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प तयार आहेत. परंतु, केवळ ८३ दश लक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली येथे १० वर्षे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. ते पूर्णत्वास येत नाही. यावेळी कंत्राटदार कंपनीने केलेल्या कामाचे बिल दिलेले नाही. त्यामुळे पुढील काम रखडले असल्याची बाब निदर्शनास आणली. कंत्राटदाराला बिल तातडीने द्यावे, असे आयुक्तांनी सूचवले. पत्रीपुलाचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. रेल्वेच्या हद्दीतून मलनिस्सारणाची वाहिनी टाकायची आहे. पूल पूर्ण होताच रेल्वेकडून त्यासाठी परवानगी दिली जाईल. मार्चनंतर सहा महिन्यात हे काम मार्गी लावण्याची हमी जीवन प्राधिकरणाने यावेळी दिली.२७ गावांचा दौरा करणार२७ गावांत लहान आकाराचे मलनिस्सारण प्रकल्प उभारावे लागतील. त्यामुळे त्या गावांची पाहणी करून कुठे नेमके प्रकल्प उभारायचे हे ठरविले जाणार आहे. या दौºयात जीवन प्राधिकरण, वनशक्ती, निरी आणि महापालिकेचे अधिकारी सहभागी असतील. संयुक्त पाहणी दौºयानंतर २७ गावातील प्रकल्पांचा अहवाल सादर केला जाणार आहे.मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५० कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. दुसºया टप्प्यात १३२ कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी ३७ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, न्यायालयात कामे पूर्ण करण्याबाबतची डेडलाइन दिली जाते. आताही डिसेंबरअखेर प्रकल्प मार्गी लागतील, अशी डेडलाइन दिली असली तरी प्रत्यक्षात ती पाळली जात नाही, याकडे ‘वनशक्ती’चे स्टॅलीन यांनी लक्ष वेधले.त्यामुळे आता डेडलाइन ही वस्तूस्थितीला धरून असली पाहिजे. ५ मार्चपूर्वी अधिकाऱ्यांनी प्रकल्प कधी व किती वेळेत मार्गी लागून प्रत्यक्षात सुरू होतील. तेथे प्रक्रिया करण्यात येणाºया अडचणींचे काय, याचे हमी पत्र आधी आयुक्तांकडे सादर करावे. त्याआधारे आयुक्त २५ मार्चला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. आता डेडलाइन मार्च २०२१ अखेरपर्यंतची होऊ शकते, असे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका