शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पुनर्वसनासाठी ठाणे महापालिकेकडे जागेची वानवा

By admin | Updated: September 11, 2015 00:58 IST

ठाणे महापालिकेकडे रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्ता रुंदीकरणाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर प्रभाग समितीमधील साईनाथनगर

- नामदेव पाषाणकर,  घोडबंदरठाणे महापालिकेकडे रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्ता रुंदीकरणाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर प्रभाग समितीमधील साईनाथनगर, जानकाईदेवीनगर, भीमनगर या भागांतून जाणारा गांधीनगरचा रस्ता याच कारणाने रखडणार आहे. येथील ३४२ बाधितांना जागा कुठे द्यायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुनर्वसनासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलन करूनही प्रशासन जागचे हलताना दिसत नाही. बारा वर्षांपासून येथील जनता वनवास भोगत असल्याने त्यांची सहनशीलता आता संपल्याच्या प्रतिक्रिया रहिवाशांकडून उमटत आहेत.येथील पात्र असलेल्या ३४२ लाभार्थ्यांची यादी शहर विकास विभागाकडे पडून असून प्रत्यक्षात त्यांच्या पदरात हक्काची घरे कधी पडणार, असा सवाल करण्यात येत आहे. मात्र, या यादीत अनेकांची नावे न आलेल्या लोकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. वाल्मीकी आंबेडकर आवास योजनेमधून येथील झोपडपट्टीतील १२४० पात्र लाभार्थ्यांपैकी २७० लाभार्थ्यांचे पुनर्वसन २००२ साली केले होते. उर्वरित पात्र रहिवासी अद्याप पुनर्वसनाच्या रांगेत उभे आहेत. २०१० मध्ये सदर झोपडीधारकांना बीएसयूपी योजनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याबाबतचा ठराव २०११ मध्ये मंजूर केला होता. परंतु, असे असतानाही येथील रहिवासी १२ वर्षे पुनर्वसनापासून वंचित आहेत. वारंवार मागण्या करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे रिपाइं एकतावादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा, आयुक्त संजय जयस्वाल यांनी झोपडीधारकांची बाजू ऐकून घेऊन झोपडीधारकांचे प्रतिनिधी आणि पालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त समिती नेमून त्यामार्फत या झोपडीधारकांची समस्या सोडविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि उपायुक्त छाया मानकर यांना दिले होते. त्याचे पुढे काय झाले, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.मागील आठवड्यात आयुक्तांनी या रहिवाशांचे कसे पुनर्वसन करता येईल, याची विचारणा शहर विकास विभागाकडे केली आहे. रस्त्यात बाधित झालेल्या ९८६ रहिवासी आणि दुकानदारांचे पुनर्वसन गेल्या २५ वर्षांपासून रखडलेले आहे. त्यांना कुठे जागा द्यायची, याचा फैसला होऊ शकलेला नाही. शहर विकास विभागाकडे पुनर्वसनासाठी जागाच शिल्लक नसल्याने अधिकारी काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याचे या विभागातून सांगण्यात येत आहे.