शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

‘पेसा’ शिवाव प्रकल्प राबवणार नाही

By admin | Updated: April 20, 2017 03:55 IST

पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची

पालघर: पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करताना पेसा कायद्याला डावलून जिल्ह्यात वाढवणं बंदरासह कोणतेही प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव प्राप्त करणे क्र मप्राप्त राहील असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी सांगितले.वाढवण बंदर, मुंबई वडोदरा जलद महामार्ग, बुलेटट्रेन, कॉरीडॉर या सारखे प्रकल्प राबविण्यासाठी त्या त्या गावच्या ग्रामसभेपुढे जावेच लागेल अशी सप्ष्ट ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. वाढवणं बंदर प्रकल्पासह अन्य प्रकल्प स्थानिकांवर लादण्याचा प्रयत्न बेमालम पणे केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी एकता परिषद, भूमीसेना, शेतकरी संघटना, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, नॅशनल फिश फोरम, भारतीय पर्यावरण चळवळ आदी संघटनाच्या शिष्टमंडळा समवेत समस्यावर सविस्तरपणे चर्चा करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या शिष्टमंडळात दत्ता करबट, वाहरू सोनावणे, सुरेश हंडवा, डॉ.सुनील पऱ्हाड, संतोष पावडे, नारायण पाटील, वैभव वझे, रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर आदींनी सहभाग घेतला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीलाच या प्रकल्पा संदर्भात निवेदने आणि झालेल्या चर्चेचे इतिवृत्त सविस्तरपणे सरकारकडे पाठविले जाईल असे सांगिलते. तर सूर्याप्रकल्पाचे पाणी जवळच्या स्थानिकांना मिळत नसल्याने लोकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, असे सांगून या बाबतही सरकारला आपण अवगत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.