शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

टिटवाळा रेल्वेस्थानकातील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:46 IST

टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे.

टिटवाळा : टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी चालत असताना या पुलाला हादरे बसतात. धोकादायक झालेला हा पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहेत.टिटवाळा स्थानकात दररोज सव्वा लाख प्रवासी या पुलावरून येजा करतात. संकष्टी व अंगारकी चतुर्थी या दिवशी गणेश मंदिरात दर्शनासाठी सुमारे पाच लाख भाविक टिटवाळ्यात हजेरी लावतात. महिनाभरात या स्थानकातून दोन कोटी ३१ लाख ९६ हजार १९१ रुपयांची कमाई रेल्वेला होते. मात्र, या स्थानकात पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी एकच पूल आहे. पर्यायी पूल नसल्याने या पुलावर गर्दी होत आहे.मुंबईतून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी टिटवाळ्यात घरे घेतली आहेत. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत आहे. सध्या टिटवाळा स्थानकात रेल्वेने नवीन पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. जुना पूल प्रवाशांच्या वजनाने हादरत आहे, असे प्रवासी पंकज महाडिक यांनी सांगितले. या पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर काही ठिकाणी गंजले आहे. तसेच स्थानकातील गर्दीला सामावण्यासाठीही हा पूल अपुरा पडत असल्याने एल्फिन्स्टन स्थानकाप्रमाणे चेंगराचेंगरी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या धोक्यांकडे रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. हा पूल १९६८ मध्ये बांधण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे श्रीनिवास कºहाडकर यांना माहिती अधिकारात मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी या पादचारी पुलाचा काही भाग खचला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून पूल रहदारीसाठीसुरू ठेवला.>आश्वासने हवेतच विरली!२०१७ मध्ये आॅक्टोबरला मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. यादरम्यान टिटवाळा पूर्व प्लॅटफॉर्म क्र मांक-१ च्या बाजूस तिकीट काउंटरपर्यंत पेव्हरब्लॉक टाकणे, प्लॅटफॉर्म क्र .१ वर अतिरिक्त जिना बनवणे, प्लॅटफॉर्म क्र . १ व २ वर जिन्याखाली मुतारी बांधणे, या सोयीसुविधा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी व रेल्वे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.या पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असल्याचेही त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, सध्या तरी हा बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरला आहे.