शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

टिटवाळा रेल्वेस्थानकातील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:46 IST

टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे.

टिटवाळा : टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी चालत असताना या पुलाला हादरे बसतात. धोकादायक झालेला हा पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहेत.टिटवाळा स्थानकात दररोज सव्वा लाख प्रवासी या पुलावरून येजा करतात. संकष्टी व अंगारकी चतुर्थी या दिवशी गणेश मंदिरात दर्शनासाठी सुमारे पाच लाख भाविक टिटवाळ्यात हजेरी लावतात. महिनाभरात या स्थानकातून दोन कोटी ३१ लाख ९६ हजार १९१ रुपयांची कमाई रेल्वेला होते. मात्र, या स्थानकात पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी एकच पूल आहे. पर्यायी पूल नसल्याने या पुलावर गर्दी होत आहे.मुंबईतून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी टिटवाळ्यात घरे घेतली आहेत. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत आहे. सध्या टिटवाळा स्थानकात रेल्वेने नवीन पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. जुना पूल प्रवाशांच्या वजनाने हादरत आहे, असे प्रवासी पंकज महाडिक यांनी सांगितले. या पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर काही ठिकाणी गंजले आहे. तसेच स्थानकातील गर्दीला सामावण्यासाठीही हा पूल अपुरा पडत असल्याने एल्फिन्स्टन स्थानकाप्रमाणे चेंगराचेंगरी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या धोक्यांकडे रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. हा पूल १९६८ मध्ये बांधण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे श्रीनिवास कºहाडकर यांना माहिती अधिकारात मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी या पादचारी पुलाचा काही भाग खचला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून पूल रहदारीसाठीसुरू ठेवला.>आश्वासने हवेतच विरली!२०१७ मध्ये आॅक्टोबरला मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. यादरम्यान टिटवाळा पूर्व प्लॅटफॉर्म क्र मांक-१ च्या बाजूस तिकीट काउंटरपर्यंत पेव्हरब्लॉक टाकणे, प्लॅटफॉर्म क्र .१ वर अतिरिक्त जिना बनवणे, प्लॅटफॉर्म क्र . १ व २ वर जिन्याखाली मुतारी बांधणे, या सोयीसुविधा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी व रेल्वे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.या पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असल्याचेही त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, सध्या तरी हा बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरला आहे.