शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

टिटवाळा रेल्वेस्थानकातील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:46 IST

टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे.

टिटवाळा : टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी चालत असताना या पुलाला हादरे बसतात. धोकादायक झालेला हा पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहेत.टिटवाळा स्थानकात दररोज सव्वा लाख प्रवासी या पुलावरून येजा करतात. संकष्टी व अंगारकी चतुर्थी या दिवशी गणेश मंदिरात दर्शनासाठी सुमारे पाच लाख भाविक टिटवाळ्यात हजेरी लावतात. महिनाभरात या स्थानकातून दोन कोटी ३१ लाख ९६ हजार १९१ रुपयांची कमाई रेल्वेला होते. मात्र, या स्थानकात पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी एकच पूल आहे. पर्यायी पूल नसल्याने या पुलावर गर्दी होत आहे.मुंबईतून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी टिटवाळ्यात घरे घेतली आहेत. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत आहे. सध्या टिटवाळा स्थानकात रेल्वेने नवीन पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. जुना पूल प्रवाशांच्या वजनाने हादरत आहे, असे प्रवासी पंकज महाडिक यांनी सांगितले. या पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर काही ठिकाणी गंजले आहे. तसेच स्थानकातील गर्दीला सामावण्यासाठीही हा पूल अपुरा पडत असल्याने एल्फिन्स्टन स्थानकाप्रमाणे चेंगराचेंगरी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या धोक्यांकडे रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. हा पूल १९६८ मध्ये बांधण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे श्रीनिवास कºहाडकर यांना माहिती अधिकारात मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी या पादचारी पुलाचा काही भाग खचला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून पूल रहदारीसाठीसुरू ठेवला.>आश्वासने हवेतच विरली!२०१७ मध्ये आॅक्टोबरला मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. यादरम्यान टिटवाळा पूर्व प्लॅटफॉर्म क्र मांक-१ च्या बाजूस तिकीट काउंटरपर्यंत पेव्हरब्लॉक टाकणे, प्लॅटफॉर्म क्र .१ वर अतिरिक्त जिना बनवणे, प्लॅटफॉर्म क्र . १ व २ वर जिन्याखाली मुतारी बांधणे, या सोयीसुविधा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी व रेल्वे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.या पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असल्याचेही त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, सध्या तरी हा बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरला आहे.