शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:13 IST

गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे

ठाणे : गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. तीनुसार मंडपाची परवानगी ३० दिवस आधी घ्यावी, असा नियम असला तरीदेखील त्याआधीच शहरात गणेशोत्सव मंडपउभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे सादर झालेल्या अर्जांवर अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने आणि गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक असल्याने काही बड्या गणेशोत्सव मंडळांनी आधीच मंडपउभारणीला सुरुवात केली आहे.गणेशोत्सवांच्या मंडपासाठी एक तृतीयांशपेक्षा जास्त रस्ता अडवू नये, पूर्वपरवानगी ३० दिवस आधी घ्यावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावा, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांची एनओसी बंधनकारक, मंडपांसाठी रस्ते खोदल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, टीएमटी बसमार्गावर १२ फूट रस्ता मोकळा ठेवावा, अशा अनेक अटींची आदर्श आचारसंहिता ठाणे पालिकेने उत्सवांसाठी तयार केली असली, तरी ती यंदाही कागदावरच राहणार आहे. पारंपरिक उत्सवांच्या मार्गात कोणतेही विघ्न निर्माण करू नये, असे अप्रत्यक्ष आदेशच राज्य सरकारकडून जारी झाल्यामुळे पालिकेला आपल्या संभाव्य कारवाईची हत्यारे उपसण्याआधीच म्यान करावी लागणार आहेत. परंतु, यावर काही तोडगा काढता येऊ शकतो, याची चाचपणी आता पालिकेने सुरू केली आहे.पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी उपस्थित होते.ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही त्यात समावेश होता. या बैठकीतील चर्चा प्रामुख्याने मुंबईतील उत्सव, त्यांना भेडसावणाºया समस्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत होती. मात्र, बैठकीदरम्यान परंपरागत उत्सवांमध्ये विघ्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, नव्याने ज्या उत्सवांना परवानगी दिली जाईल, ती नियमांच्या काटेकोर चौकटीतच द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, मागील वर्षीदेखील पालिकेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाºया मंडळांना पालिकेने नोटिसा बजावून एक लाख रुपये भरण्याचे फर्मान काढले होते.परंतु, याला राजकीय विरोध झाल्याने पालिकेला आपली तलवार म्यान करावी लागली होती. आता कुठला निर्णय घेते याकडे लक्ष आहे.>गणेश मंडळांना आधीच जाणीवआतादेखील राज्य सरकारकडूनच अप्रत्यक्षरीत्या उत्सव साजरे करण्याबाबत कोणतेही विघ्न न आणण्याचे सांगण्यात आल्याने पालिकेला आपली आदर्श आचारसंहिता अडगळीत टाकावी लागणार आहे.कदाचित गणेशोत्सव मंडळांनादेखील याची जाणीव आधीच झाली असणार म्हणूनच त्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मंडपउभारणीचे काम सुरू केल्याचे काही ठिकाणी दिसत आहे.मंडप उभारणीसाठी ३० दिवस आधी परवानगी घ्यावी, अशी पालिकेच्या आदर्श आचारसंहितेत अट आहे. परंतु, आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिकेने अद्यापही अर्जांवर निर्णय न घेतल्याने काही मंडळांनी आधीच मंडप उभारणीला सुरुवात केली आहे.