शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सकवार परिसरातील १४ पाड्यांना बारमाही पाणी

By admin | Updated: June 21, 2016 00:55 IST

सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला

वसई : सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला. दोन ठिकाणी शेततळी आणि ओढा खोदाई केली असता चक्क उन्हाळ्यात पाणी लागले. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या सकवार परिसरातील आदिवासी पाड्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. सोबतच भात शेतीसह भाज्यांचा मळाही फुलणार आहे. ही किमया साधली आहे, विवेक राष्ट्र सेवा समितीने आमदार अतुल भातखळकर यांच्या साथीने. पावसाळ्यातील तीन महिने पूरसदृश्य परिस्थिती आणि पाऊस गेल्यानंतर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट अशी परिस्थिती सकवार गावातील १४ पाड्यांमधील ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या अनुभवताहेत. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सकवार हे टकमक कडा या डोंगर उतारावर वसलेले संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. पावसाळ्यात प्रचंड ओघाने डोंगरावरील पाणी गावाकडे येते. त्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्मण होते. येथील ओढा दुथडी भरून वाहु लागतो. पाऊस संपला की जमिनीशी समतळ असलेल्या या ओढ्यातील पाणी सखल भागात वाहून जाते. त्यानंतर या गावात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होते. ओढा कोरडा पडतो. मग सुरु होते,पाण्यासाठी वणवण. पावसाळ्यात भात शेतीची लागवड होते. तितकेच समाधान या गावाला मिळते. त्यानंतर मात्र,९ महिने शेती ठप्प आणि शेतकरी बेरोजगार होतात.(प्रतिनिधी)पाठपुरावा व गाव दत्तक घेतलेही व्यथा भालीवली येथे सामजिक कार्य करणाऱ्या विवेक राष्ट्र सेवा समितीच्या निदर्शनास आली.पावसाळ्यातील पाणी अडवल्यास सकवारला बाराही महिने पाणी उपलब्ध होईल. लोक सहभागातून पाणी अडविण्याचे समितीने ठरवले. आमदार भातखळकर यांना प्रदीप गुप्ता यांनी ही योजना सांगितली. त्यांनी आदर्श दत्तक ग्राम योजनेत सकवार गावाला दत्तक घेतले. बोंगेपाडा आणि सुतारपाडा या गावात खोदलेल्या शेततळ्यातील झरे पाझरू लागले. त्यामुळे बोंगेपाड्याचा पाणी प्रश्न उन्हाळ्यातच मार्गी लागला आहे. वनखात्याचे पालघर ए. सी. एम. कुप्ते, डी.एम.ओ.लडकत यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.ओढ्यात खोदले चर पाणी साठू लागले झरझरहे यश हाती लागताच समितीने टकमक कड्याचा ओढ्याकडे लक्ष केंद्रीत केले. या ओढ्यातील पाणी कसे अडवता येईल यासाठी प्रदीप गुप्ता आणि शशांक नाखरे यांनी पुण्यातील जलवर्धिनी संस्था आणि ठाण्यातील जलतज्ज्ञ अप्पा परांजपे यांच्याकडून टिप्स घेतल्या. या टिप्सच्या आधारे एक किलोमीटर लांबीच्या टकमक ओढ्याची खोली वाढवण्यात आली. महिनाभर हे काम सुरु होते.या ओढ्यात काही ठिकाणी आवश्यकतेनुसार १०, १२ आणि १५ फुटांचे चर खोदण्यात आले आहेत. त्यामुळे कोरडा पडलेल्या ओढ्यातील झरे मोकळे होऊन या खड्ड्यांमध्ये ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी जमले आहे. पोकलेनच्या सहाय्याने काम करण्यात आले. त्यासाठी नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश नाईक यांनी विनामूल्य पोकलेन उपलब्ध करून दिला. तसेच अनेक दानशूरांनी सढळ हाताने मदत केली.ओढ्याची खोली वाढवल्यामुळे मे महिन्यात झऱ्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आनंदित झाले आहेत. पावसाळ्याचे पाणी आता वाहून न जाता ते खोल ओढ्यात साचून राहणार आहे. त्याममुळे जमिनीचेही पुनर्भरण होणार आहे. बाराही महिने पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे भात शेती नंतर गवार, भेंडी, कारले, काकडी, दुधी, पांढरे, लाल कांदे अशी लवकर नफा देणारी पिके ग्रामस्थांना घेण्याचे प्रशिक्षणही विवेक राष्ट्र सेवा समितीचे शेतीतज्ञ देणार आहेत. त्यामुळे बोंगेपाडा, गावठाण, पाटीलपाडा , कारेला पाडा, गोवारीपाडा, बेणापाडा, वरखंडपाडा, सुतारपाडा यासह १४ आदिवासी पाडे लवकरच शेतीने समृद्ध झालेली दिसणार आहेत.