शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांची टक्केवारी पुन्हा लागली वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST

ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र ...

ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र त्सुनामीसारख्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत घट झाली होती. परंतु आता कोरोनाशी दोन हात करून त्याला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, अशांची टक्केवारी ८९.०४ इतकी आहे. म्हणजे आतापर्यंत ४ लाख १३ हजार २५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील ३ लाख ५८ हजार ६२३ जण असून, नगरपालिका हद्दीतील ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिकांचा समावेश आहे. ही जिल्ह्यासाठी आनंददायक बाब आहे ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागाला गेला आहे. तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ६२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. नगरपालिका हद्दीत ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिक मात करत घरी परतले आहे. एकूण जरी टक्केवारी ही ८९.०४ वर पोहोचली असली तरी सहा महापालिकांची एकूण टक्केवारी ८९.२७ इतकी आहे. दोन नगरपालिकांमधील ८८.६६, तर ग्रामीण भागाची टक्केवारी ८६.०४ इतकी असल्याची माहिती शासकीय आकडेवारी दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत १ लाख ५ हजार ९५० जणांनी कोरोना हरवले असून, ती टक्केवारी ८९.६१ इतकी आहे. नवी मुंबईत ८३ हजार ६७२ जण बरे झाले असून, तेथील टक्केवारी ९०.९७ टक्के इतकी आहे. केडीएमसीत १ लाख ५ हजार ७५० सुखरूप घरी परतले असून, तेथील टक्केवारी ८८.१९ इतकी आहे. मीरा भाईंदर ३७ हजार ६५६ (८७.१३), भिवंडीत ०८ हजार ९०० (९०.६७), उल्हासनगर १६ हजार ६९३ (८९.१४), अंबरनाथ १५ हजार २२६ (८६.२७), कुळगाव बदलापूर १६ हजार ६७७ (९०.७२), तर ग्रामीण भागात २२ हजार ७२६ जणांनी कोरोनाला पळवून लावल्याचे आकडेवारी दिसत आहे.

.............

वाचली