शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांची टक्केवारी पुन्हा लागली वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST

ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र ...

ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र त्सुनामीसारख्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत घट झाली होती. परंतु आता कोरोनाशी दोन हात करून त्याला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, अशांची टक्केवारी ८९.०४ इतकी आहे. म्हणजे आतापर्यंत ४ लाख १३ हजार २५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील ३ लाख ५८ हजार ६२३ जण असून, नगरपालिका हद्दीतील ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिकांचा समावेश आहे. ही जिल्ह्यासाठी आनंददायक बाब आहे ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागाला गेला आहे. तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ६२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. नगरपालिका हद्दीत ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिक मात करत घरी परतले आहे. एकूण जरी टक्केवारी ही ८९.०४ वर पोहोचली असली तरी सहा महापालिकांची एकूण टक्केवारी ८९.२७ इतकी आहे. दोन नगरपालिकांमधील ८८.६६, तर ग्रामीण भागाची टक्केवारी ८६.०४ इतकी असल्याची माहिती शासकीय आकडेवारी दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत १ लाख ५ हजार ९५० जणांनी कोरोना हरवले असून, ती टक्केवारी ८९.६१ इतकी आहे. नवी मुंबईत ८३ हजार ६७२ जण बरे झाले असून, तेथील टक्केवारी ९०.९७ टक्के इतकी आहे. केडीएमसीत १ लाख ५ हजार ७५० सुखरूप घरी परतले असून, तेथील टक्केवारी ८८.१९ इतकी आहे. मीरा भाईंदर ३७ हजार ६५६ (८७.१३), भिवंडीत ०८ हजार ९०० (९०.६७), उल्हासनगर १६ हजार ६९३ (८९.१४), अंबरनाथ १५ हजार २२६ (८६.२७), कुळगाव बदलापूर १६ हजार ६७७ (९०.७२), तर ग्रामीण भागात २२ हजार ७२६ जणांनी कोरोनाला पळवून लावल्याचे आकडेवारी दिसत आहे.

.............

वाचली