शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी एप्रिलमध्ये लोक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

ठाणे : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ...

ठाणे : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १० एप्रिलला सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, सहकार न्यायालये आणि इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिवाणी, फौजदारी, तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, धनादेशासंबंधीचे, १३८ एन. आय. कायद्यान्वये दाखल प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारविषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे आदी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी पक्षकारांनी त्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी या लोक न्यायालयात दाखल करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

येथे अर्ज करण्याचे आवाहन

- संबंधित प्रकरणे निकालासाठी ठेवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- लोक न्यायालयाबाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास वाशी-नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी कार्यालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे, येथे प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.

--------------------