शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

नागरी सोयीसुविधा करणार लोकाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

कल्याण : केडीएमसीचा १,७०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना नागरी सोयीसुविधा लोकाभिमुख करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. ...

कल्याण : केडीएमसीचा १,७०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना नागरी सोयीसुविधा लोकाभिमुख करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच थिंक टँक स्कीम ही नवी संकल्पना वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे विचार गट तयार केले जातील. त्याला थिंक टँक स्कीम, असे आयुक्तांनी संबोधले आहे. मनपाने स्मार्ट सिटीचे प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अशा प्रकारे लोकांकडून काही अभिप्राय मागवले होते. त्यावेळी कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, नागरिकांना नेमके काय हवे, याची चाचपणी करून स्टेशन परिसराचा विकास हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानंतर सरकारच्या इज ऑफ लिव्हिंग या सर्वेक्षणावेळी शहर तुम्हाला नेमके कसे हवे आणि ते राहण्यायोग्य आहे का, असा कल जाणून घेतला होता. मात्र, शहरातील समस्या सोडवण्यासाठी थिंक टँक स्कीमची मात्रा कितपत लागू पडते, हे पाहावे लागणार आहे. मात्र, आयुक्तांच्या या नव्या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले आहे.

मनपा हद्दीतील कचरा समस्या सोडवण्यासाठी सध्या शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. त्यानंतर आता शहरातील रस्ते आणि उद्याने विकसित केली जाणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसराचा विकास सध्या सुरू आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. सिटी पार्क आणि काळा तलावाचाही विकास करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी

- शहरातील नदीकिनारा आणि उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे.

- पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

- शहरात एलईडी दिवे लावून विजेची बचत केली जाणार आहे. नागरी सुविधा केंद्रे स्मार्ट करण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- उद्याने विकसित करण्यासाठी दोन कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. उल्हास नदीचा किनारा सुशोभीकरण करणे, दुर्गाडी परिसरात नौदल आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे.

- महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर यंदा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक प्रणाली व सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

---------------------------------