शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

दंड चुकवणाऱ्यांचे अर्ज होणार बाद!

By admin | Updated: February 3, 2017 02:07 IST

पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे.

ठाणे : पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे. पूर्वी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांनाच निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. परंतु, आता यापुढेही जाऊन ज्यांनी जकात चुकवली असेल, एलबीटीचा भरणा केलेला नसेल व अनधिकृत बॅनर, पोस्टर लावून दंडाची रक्कम अद्यापही भरलेली नसेल, अशांवरही उमेदवारी अर्ज बाद होण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मालमत्ता व पाणीपट्टी भरणा केल्यानंतर, त्याचे शपथपत्र मिळवण्यासाठी प्रभाग समितीत अर्ज केले आहेत. मात्र आता त्यांच्यावर पालिकेच्या निवडणूक विभागाकडून आणखी एक तलवार कोसळणार आहे. (प्रतिनिधी) कोणाचा होणार पत्ता कट?विशेष म्हणजे, येथील व्यापारीवर्ग प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांचीच या करांची थकबाकी अधिक असू शकते. तसेच काही राजकीय मंडळींनी वाढदिवसांचे, स्वागताचे बॅनर, पोस्टर लावताना परवानगी घेतली नसेल व दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होण्यापूर्वी थकबाकीदारांची नावे जाहीर होणार आहेत. त्यामुळे यातून कोणाचा पत्ता कट होणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.