शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतींचे दंडात्मक शुल्क कमी होणार? नगरविकासकडून समिती स्थापन : १५ दिवसांत दिलाशाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारती नियमित करताना दंडात्मक शुल्क कमी करणे, पुनर्विकासाचे चटईक्षेत्र निश्चित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारती नियमित करताना दंडात्मक शुल्क कमी करणे, पुनर्विकासाचे चटईक्षेत्र निश्चित करणे यासारखे निर्णय घेण्याकरिता शासनाने समितीची स्थापना करण्याचे आदेश जारी केले असून, समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. यामुळे धोकादायक इमारतीत वास्तव्य करणाऱ्या शहरवासीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून, गेल्या महिन्यात १२ जणांचा बळी जाऊन अनेकजण जखमी झाले. शेकडोजण बेघर झाले. यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याकरिता व धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे व महापौर लीलाबाई अशान यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची जुलै महिन्यात मंत्रालयात बैठक बोलावून समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर शासनाने समिती स्थापन केली. समितीमध्ये महसूल विभागाचे अपर सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान व अपर सचिव, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, जमावबंदी आयुक्त, महापालिका आयुक्त व तीन तज्ज्ञ व्यक्ती असणार आहेत. याखेरीज अन्य काहीजणांचा समितीत समावेश होऊ शकतो.

शासनाने २००६ मध्ये काढलेल्या विशेष अध्यादेशानुसार सुधारित निर्णय घेणार आहे. स्थापन केलेली समिती अनधिकृत बांधकामाचे दंडात्मक शुल्क कमी करण्याबाबत शिफारस करणे, बांधकामे उभी करताना कोणत्या योजनेतून हे निश्चित करणे, पुनर्विकासासाठी चटईक्षेत्र निश्चित करणे, सोसायटीच्या डिम कन्व्हेन्ससाठीचे मुद्रांक शुल्क व दंड निश्चित करणे आदीबाबत शासनाला शिफारस करणार आहे. त्यासाठी समितीला १५ दिवसांचा वेळ दिला आहे. महापौर अशान यांनी मंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

.........

वाचली