शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वीज वितरण कंपनीची थकबाकी केली चुकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची रक्कम अदानी समूहाने चुकती केली आहे. त्यासाठी १ कोटी ६९ लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीला मंगळवारी सुपूर्द करण्यात आला.

एनआरसी कंपनी २००९ साली आर्थिक कारणास्तव बंद पडली. त्यामुळे वीज बिलाचा नियमित भरणा कंपनीकडून केला जात नव्हता. परिणामी, कंपनीचा वीज पुरवठा २०१६ साली वीज वितरण कंपनीने खंडित केला होता. अनेक निवेदने प्राप्त झाल्यावर ज्या पंप हाउसमधून पाणीपुरवठा केला जातो, त्या लाइनचा पुरवठा महावितरणने सुरू केला होता. मात्र कंपनीकडून पंप हाउसचेही बिल भरले जात नव्हते. त्या कारणावरून कंपनी आणि वीज वितरण कंपनीत वादविवाद सुरू होते. दरम्यान, आर्थिक संस्थांनी एनआरसीविरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये कर्ज वसुलीचा दावा दाखल केला होता. लवादाच्या आदेशानुसार कोर्टाने जो नादारी आदेश काढला, त्या आधीची सर्व देणी रद्दबातल ठरतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदीनुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच बिल अदानी समूह देणे लागतो. त्यानुसार अदानी समूहाने वीज वितरण कंपनीकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने अदानी समूहाला १ कोटी ६९ लाख रुपयांचे बिल पाठविले होते.

-----------------------------