शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांतील रस्त्यांसाठी ३२७ कोटी रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:22 IST

केडीएमसीची राज्य सरकारकडे मागणी; चाळण झाल्याने नव्यानेच बनवावे लागणार रस्ते

कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांतील १९० किलोमीटर लांबीचे डांबरी रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांसाठी निधी नसल्याने राज्य सरकारने ३२७ कोटी रुपयांचा विशेष निधी द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे.१९८३ पासून २७ गावे महापालिका हद्दीत होती. या गावांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याने ती महापालिकेतून वगळण्याची मागणी केली गेली. तत्कालीन सरकारने ही गावे २००२ मध्ये महापालिकेतून वगळली. मात्र, पुन्हा जून २०१५ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. तेव्हापासून या गावांतील डांबरी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च केलेला नव्हता. त्यातच २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेली अतिवृष्टी व पुरामुळे २७ गावांतील रस्त्यांची चाळण झाली आहे.२७ गावांमधील १९० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी ७८ किलोमीटर लांबीचे प्रमुख रस्ते आहेत. २७ गावांतील ९-आय या प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत ४४ किलोमीटर आणि १० ई प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत ३४ किलोमीटर रस्त्यांचे काम करावे लागणार आहे. या रस्त्यांवरील केवळ खड्डे भरून चालणार नसून, तेथे नव्याने रस्ते बांधावे लागणार आहेत. त्यासाठी ३२७ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, २७ गावांतील रस्त्यांची दुरवस्था जास्त असल्याने त्यांचा प्रस्ताव आधी तयार करून राज्य सरकारकडे निधीची मागणी आयुक्तांमार्फत केली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचेही सर्वेक्षण सुरू आहे. त्याचाही एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.निधी मिळण्याबाबत साशंकताजून २०१५ पासून २७ गावे महापालिकेत आल्यावर महापालिकेची हद्द वाढली. त्यामुळे महापालिकेस एक हजार कोटी रुपये हद्दवाढ अनुदान मिळावे, अशी मागणी माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सरकारकडे अनेकदा केली. त्याचबरोबर मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. अनुदान दिले जात नसल्यास ही गावे महापालिकेतून वगळावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, तरीही सरकारने अनुदान देण्याविषयी कोणताच शब्द काढलेला नाही. यामुळे रस्त्यांसाठी विशेष निधी देण्याच्या मागणीचा सरकारकडून विचार केला जाईल का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.पुन्हा एमएमआरडीएच्या गळ्यात रस्ते?शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने पक्षाच्या नगरसेवकांची एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत वर्षभरापूर्वी झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ अनुदानासाठी सरकारची अनुकूलता नाही, असे संकेत देत २७ गावांतील विकासकामे एमएमआरडीएद्वारे केली जातील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे २७ गावांतील रस्ते विकासाचे घोंगडे पुन्हा एमएमआरडीएच्या गळ्यात मारले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा