शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

काळू धरणात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मूळमालकांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

मुरबाड : मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित काळू नदीवरील धरणाचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा करताच दलालांनी बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ...

मुरबाड : मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित काळू नदीवरील धरणाचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा करताच दलालांनी बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उचलत कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे यापैकी खरेदी करणारे बहुतांश दलाल शेतकरी नसल्याचे समजते. धरणात जमिनी गेल्या तर कोट्यवधींचा भाव मिळणार असल्याने खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी लाखो रुपये घालवले जात आहेत. यासाठी पोटदलालांची टोळी सक्रिय आहे. धरणात जाणाऱ्या जमिनीला देण्यात येणारा मोबदला मूळ शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्टप्रणीत महाराष्ट्र राज्य किसानसभेने केली आहे.

मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या काळू धरणाला बाधित गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावूनही काही उपयोग झाला नाही. धरण बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरीही शेतकऱ्यांचा विरोध ठाम आहे. काही गावांत तर दलालांना गावबंदी करण्यात आली आहे. परंतु वर्षानुवर्षे जमीन एकाच्या नावावर तर कसतो दुसरा. यामुळे कसणाऱ्यांच्या नकळत जमीन विकल्या जात आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उचलत कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचे सत्र सुरू आहे. मुरबाड दुय्यम निबंधक कार्यालयात कागदपत्र काढण्यासाठी नेट नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जाते. चार-चार महिने अर्ज करूनही संचिका मिळत नाहीत. महसूल विभाग म्हणजे अधिकारी आणि दलाल यांना आंदण दिल्याचे वास्तव समोर येत असून, सर्वसामान्य या विभागाच्या कुरापतीने बेजार झालेला आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रथम पर्याय म्हणून काळू धरणातील जमिनींचा मिळणारा मोबदला मूळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्टप्रणीत महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.