शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बुलेट ट्रेनप्रमाणेच भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:19 IST

विरार-अलिबाग कॉरिडॉर : युवा मोर्चाचा असहकार्याचा इशारा

कल्याण : विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्यांना बुलेट ट्रेनसाठी संपादित केल्या जाणाºया जमिनीला दिला जातो तेवढाच मोबदला देण्याच्या मागणीसह अन्य मागण्या पूर्ण करा. अन्यथा प्रकल्पास सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला आहे.

युवा मोर्चाचे गजानन पाटील यांच्या शिष्टमंडळाने मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतून विरार-अलिबाग कॉरिडॉर जातो. अलिबाग, पनवेल, पेण, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, पालघर, वसईतील शेतकºयांच्या जमिनी यात बाधित होत आहेत. जमिनीचा दर कमी दिला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात जो दर दिला गेला तोच दर या प्रकल्पबाधितांना मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पानजीकच्या बाधितांना बांधकाम करायचे झाल्यास शून्य समास अंतर सोडून त्यास ना हरकत दाखला मिळाला पाहिजे. विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे बांधकाम करण्यास ना हरकत दाखल्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये. घराच्या बदल्यात घर दिले जावे. जमिनीच्या बदल्याच जमीन दिली जावी. प्रकल्पापासून सर्व्हिस रोडची सुविधाही असायला हवी. तसेच बाधित आणि स्थानिकांना हा रस्ता टोलफ्री असावा. घारिवली, संदप, काटई आणि कोळे गावातील पूर्वीचे नकाशे व सातबारा नंबर यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची घरे बाधित होत आहे. ही घरे बाधित होऊ नये यासाठी केलेला बदल रद्द करण्यात यावा. पुन्हा नव्याने नकाशे व सातबारा याचा फेरविचार करण्याची गरज आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण कमी होऊ शकते. विरार अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पास संत सावळाराम महाराज यांचे नाव दिले जावे, अशी मागणीही युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.‘तो’ मोबदला मार्गी लावाच्भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरणातील बाधितांना मोबदला आधी देण्यात यावा यासाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे.च्मोबदला न मिळाल्यास कॉरिडॉरला गावांतील बाधित सहकार्य करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.