शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

निराधारांच्या अन्नदाता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:26 IST

- प्रज्ञा म्हात्रे    अनाथांना आधार देत, भुकेल्यांचे पोट भरत त्यांना जगण्याचे बळ देण्याचे सेवाभावी काम अनेक संस्था करतात. ...

- प्रज्ञा म्हात्रे

   अनाथांना आधार देत, भुकेल्यांचे पोट भरत त्यांना जगण्याचे बळ देण्याचे सेवाभावी काम अनेक संस्था करतात. पण या संस्थांनाही पोट असतेच की! सरकार, दानशूर व्यक्तींचा मदतीचा हात नसेल तर या संस्था निराधारांचे पोट भरणार कशा? त्यांना मदत करणे ही तर प्रत्येकाचीच सामाजिक बांधिलकी. याच बांधिलकीच्या सदभावनेतून धान्यपेढीची संकल्पना राबवत ठाण्यातील उज्ज्वला बागवाडे निराधारांच्या अन्नदाता झाल्या. बीड जिल्ह्यातील सेवाश्रम, शांतिवन आणि श्रद्धा फाउंडेशन या संस्था त्यांनी दत्तक घेतल्या.

गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या उज्ज्वला बागवाडे यांनी मासिकात शांतिवन, श्रद्धा फाउंडेशन या संस्थांच्या कार्याचा लेख वाचला आणि त्या भारावल्या. लागलीच बीड जिल्ह्यातील शांतिवन संस्थेत गेल्या. तेथील काम पाहून प्रभावित झाल्या. परंतु निधीअभावी रखडलेली कामे पाहून त्यांना खंत वाटली.

दरम्यान, वॉकला जाताना त्यांना मनोरुग्ण मुलगी दिसली. तिला योग्य उपचार, मायेचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी श्रद्धा फाउंडेशनमध्ये दाखल केले. दोन महिन्यांनी ती बरी झाल्याचा फोन आला. तिला भेटायला गेल्या. तिने त्यांच्याकडे बिस्किट मागितले. त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की, पोटासाठी अनेक जण इतरांकडे हात पसरतात. मात्र याच हातांना आधार देत नव्याने उभे राहण्याचे बळ अशा संस्था करीत आहेत. म्हणूनच अशा संस्थांच्या हातांना बळ लाभायला हवे असे त्यांना वाटू लागले.

दुसºया दिवशी त्यांनी परिचयाच्या १२ गृहिणींना घरी बोलावले. शांतिवनची परिस्थिती सांगितली. निधी नसेल तर संस्थेतील निराधारांचे पोट कसे भरणार? हे लक्षात घेऊन त्यांनी धान्य द्यायचे ठरविले. प्रत्येकीने कमीतकमी एक किलो परवडणारे धान्य देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तीन महिन्यांनी एकदा धान्य द्यायचे ठरले. परंतु तेही पुरे पडणारे नव्हते. दाते वाढावेत म्हणून प्रत्येकीला दहा माणसे जोडायला सांगितले. यातून हळूहळू दात्यांची साखळी तयार झाली. ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ या उक्तीप्रमाणे गेल्या पाच-सहा वर्षांत साखळी वाढली असून या धान्यपेढीशी चारशेहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. दरम्यान, त्यांनी ‘वुई टुगेदर’ या महिला गटाचीही स्थापना केली. नवरा, मुलगी यांच्या पाठिंब्यामुळेच हे काम करू शकत आहे, असे त्यांनी सांगितले. आता इतर काही संस्थाही दत्तक घेण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सर्वांच्या पोटाला अन्न मिळावे यासाठीची त्यांची धडपड अविरत सुरू आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत