शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सहा महिन्यांत होणार पत्रीपुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:29 IST

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार पुलाची लांबी ११० मीटर तर रुंदी ११ मीटर आहे.

कल्याण : पत्रीपुलावरील वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे लोकप्रतिनिधी, महापालिका, रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळास टीकेचे लक्ष्य केले जात आहे. याप्रकरणी महासभेत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करत संताप व्यक्त केल्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुलाचे काम सहा महिन्यांत अर्थात फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण होणार असल्याचा फलक पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी लावला आहे. त्यामुळे अजून सहा महिने वाहनचालकांना कोंडीतूनच वाट काढावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार पुलाची लांबी ११० मीटर तर रुंदी ११ मीटर आहे. पुलासाठी ओपन वेब स्टील गर्डर ७७ मीटरचे आहेत. सेमी थ्रू टाइप स्टील गर्डर ३३ मीटरचे आहेत. १२ मीटर व्यासाचे २२ नग पाइल फाउंडेशन आहे. दोन अबुटमेंट व एक पीअर असे तांत्रिक व बांधकामाचे टप्पे भाग आहेत. आतापर्यंत २२ पैकी पाच पाइलचे काम पूर्ण झाले आहे. अन्य पाच पाइल तसेच ओपन वेब स्टील गर्डर व सेमी थ्रू टाइप स्टील गर्डरचे काम प्रगतीपथावर आहे. पुलाचा सांगाडा हा हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. तो डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत येणे अपेक्षित आहे. तो त्या पुलावर ठेवून पूल वाहतुकीसाठी फेब्रुवारी २०२० अखेर खुला होऊ शकतो, असे महामंडळाने सांगितले आहे.