शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खड्ड्यांवरून पालिका प्रशासन धारेवर, कामाच्या दर्जाबाबत खंत : स्थायी समितीच्या सभापतींनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:00 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांचे पडसाद शुक्रवारच्या केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. सर्व पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रशासन अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांचे पडसाद शुक्रवारच्या केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. सर्व पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रशासन अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. या वेळी सभापती रमेश म्हात्रे यांनीही रस्त्यांच्या कामात दर्जा योग्य प्रकारे राखला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर, सोमवारपासून डांबरीकरणाची कामे सुरू केली जातील, असे स्पष्टीकरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिले.केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे. पावसाने उघडीप देऊनही केवळ खडीकरण केले जात असल्याने सध्या सर्वत्र धुळीचे वातावरण पसरले आहे. या खड्ड्यांबाबत शुक्रवारी ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. केडीएमसीच्या स्थायीच्या बैठकीतही खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजपाचे सदस्य विकास म्हात्रे यांनी खड्ड्यांच्या मुद्याकडे लक्ष वेधले. वर्षभर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असतात, तरीही खड्डे का पडतात, असा सवाल त्यांनी केला. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, उत्सव संपला तरी खड्डे काही बुजवले नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. हे खड्डे नक्की बुजवणार आहात की नाही, अशीही विचारणा त्यांनी अधिकाºयांना केली. वर्षातून चार ते पाच वेळा खड्डे बुजवण्याची कामे केली जातात. परंतु, वारंवार खड्ड्यांचे चित्र पाहावयास मिळते. अशा प्रकारे निकृष्ट पद्धतीने काम करणाºया कंत्राटदारांची बिले रोखा. जोपर्यंत कामे योग्य प्रकारे होत नाही, तोपर्यंत त्यांना बिले अदा करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांमधील खड्डे बुजवण्याची कामे केली जातात. परंतु, मे महिन्यातही ही कामे पूर्ण झालेली नव्हती. खड्डे बुजवण्याची कामे ठरावीक कंत्राटदारांनाच दिली जातात. निकृष्ट पद्धतीचे डांबर वापरले जाते. त्यात आॅइलिंगचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे कामांचा दर्जाही योग्य प्रकारे राखला जात नाही. अधिकाºयांकडून कामाचा दर्जा तपासलाही जात नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. कामांच्या योग्यतेबाबत जोपर्यंत नगरसेवकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत बिले अदा करू नका, असे आदेशही म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.