शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कचरागाड्या फिरकत नसल्याने गृहसंकुलांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने ...

कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने काढले आहेत. मात्र, दोन्ही शहरांतील बहुतांश गृहसंकुले जुनी असून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही. त्यामुळे विलंब होत असताना दुसरीकडे केडीएमसीकडून नोटिसांचा सिलसिला सुरूच आहे. यात आता कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता अडवणूक केली जात असल्याचा आरोप गृहसंकुलांकडून होत आहे.

केडीएमसीने नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे कचरागाडीत देणे बंधनकारक केले आहे. तसेच दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची सक्ती केली आहे. तर, सुका कचरा दररोज किंवा बुधवार व रविवारी प्रभागात नेमलेल्या एजन्सीकडे देण्यास सांगितले आहे. मात्र, गृहसंकुलांमध्ये पुरेशी जागा नसल्याने प्रकल्प राबविण्यास मर्यादा येत आहेत. तसेच खर्च मोठा असल्याने प्रकल्प राबवायचा कसा, असाही यक्षप्रश्न आहे.

त्यातच दुसरीकडे नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत त्याप्रमाणे कार्यवाही करावी अन्यथा आपला कचरा स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा मनपाने घेतला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे गृहसंकुलांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रकल्प राबविण्याची तयारी गृहसंकुलांनी केली आहे. परंतु, जागेची समस्या असल्याने तसेच हा प्रकल्प खर्चिक असल्याने एकूणच या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच कचरा घेण्यासाठी येणाऱ्या गाड्याही आठवड्यातून चार ते पाच दिवस गृहसंकुलांकडे फिरकत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. ओला कचरा दररोज डम्पिंगवर नेणे आवश्यक असताना नेला जात नाही. त्यामुळे तो साचून राहत असल्याने दुर्गंधी येत आहे. यासंदर्भात कोकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

------------

जागेअभावी प्रकल्प राबविण्यास मर्यादा आहेत. गृहसंकुल उभारणाऱ्या बिल्डरशीही आमची चर्चा सुरू आहे. प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु तत्पूर्वीच कचऱ्याच्या गाड्या पाठविणे बंद केल्याने चार ते पाच दिवस कचरा गृहसंकुलाचा कचरा नेला जात नाही. आधीच कोरोनाचे संकट वाढत असताना कचरा वेळच्यावेळी उचलला जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गहन बनला आहे.

- लक्ष्मण इंगळे, सचिव, सर्वाेदय लीला सोसायटी, ठाकुर्ली

-----------------