शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कचरागाड्या फिरकत नसल्याने गृहसंकुलांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने ...

कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने काढले आहेत. मात्र, दोन्ही शहरांतील बहुतांश गृहसंकुले जुनी असून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही. त्यामुळे विलंब होत असताना दुसरीकडे केडीएमसीकडून नोटिसांचा सिलसिला सुरूच आहे. यात आता कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता अडवणूक केली जात असल्याचा आरोप गृहसंकुलांकडून होत आहे.

केडीएमसीने नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे कचरागाडीत देणे बंधनकारक केले आहे. तसेच दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची सक्ती केली आहे. तर, सुका कचरा दररोज किंवा बुधवार व रविवारी प्रभागात नेमलेल्या एजन्सीकडे देण्यास सांगितले आहे. मात्र, गृहसंकुलांमध्ये पुरेशी जागा नसल्याने प्रकल्प राबविण्यास मर्यादा येत आहेत. तसेच खर्च मोठा असल्याने प्रकल्प राबवायचा कसा, असाही यक्षप्रश्न आहे.

त्यातच दुसरीकडे नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत त्याप्रमाणे कार्यवाही करावी अन्यथा आपला कचरा स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा मनपाने घेतला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे गृहसंकुलांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रकल्प राबविण्याची तयारी गृहसंकुलांनी केली आहे. परंतु, जागेची समस्या असल्याने तसेच हा प्रकल्प खर्चिक असल्याने एकूणच या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच कचरा घेण्यासाठी येणाऱ्या गाड्याही आठवड्यातून चार ते पाच दिवस गृहसंकुलांकडे फिरकत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. ओला कचरा दररोज डम्पिंगवर नेणे आवश्यक असताना नेला जात नाही. त्यामुळे तो साचून राहत असल्याने दुर्गंधी येत आहे. यासंदर्भात कोकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

------------

जागेअभावी प्रकल्प राबविण्यास मर्यादा आहेत. गृहसंकुल उभारणाऱ्या बिल्डरशीही आमची चर्चा सुरू आहे. प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु तत्पूर्वीच कचऱ्याच्या गाड्या पाठविणे बंद केल्याने चार ते पाच दिवस कचरा गृहसंकुलाचा कचरा नेला जात नाही. आधीच कोरोनाचे संकट वाढत असताना कचरा वेळच्यावेळी उचलला जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गहन बनला आहे.

- लक्ष्मण इंगळे, सचिव, सर्वाेदय लीला सोसायटी, ठाकुर्ली

-----------------