शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी पडताळणी आता होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:29 IST

ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे. संबंधित अर्जदाराने पासपोर्टसाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर पोलीस संपूर्ण माहिती घेण्यासाठी टॅब घेऊनच घरी पोहोचणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन योजनेंतर्गत पासपोर्ट विभागाने ही योजना राबवण्याचे देशभरातील पोलीस यंत्रणांना सूचित केले आहे. राज्यात काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणचाही समावेश आहे. त्यानुसार, सुमारे अडीच लाख रुपये खर्चातून १७ पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि अधीक्षक कार्यालयासाठी एक असे १८ टॅब खरेदी करण्यात आले. पासपोर्टच्या पडताळणीसाठी पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. पडताळणीच्या कामासाठी दोनदोन महिनेही लागत होते. आता हे काम अवघ्या एका आठवड्यात तेही खर्चाविना केले जात आहे.>कागदपत्रेही जागीच स्कॅन केली जातातपासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्याची फाइल तो वास्तव्यास असलेल्या ठाणे ग्रामीणच्या संबंधित पोलीस ठाण्यात पाठवली जाते.ती आल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन वास्तव्याची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याच वेळी त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वगैरे दाखल आहे किंवा कसे, याचीही माहिती घेतली जाते.ही माहिती घेतल्यानंतर जागीच त्याचा फोटो घेऊन कागदपत्रेही टॅबद्वारेच स्कॅन केली जातात.ही माहिती दुसºयाच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवली जाते. साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना आॅनलाइन पडताळणी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.>पूर्वी पासपोर्टच्या पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात बºयाच फेºया माराव्या लागत होत्या. आता केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन धोरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्टसाठी ही घरपोच सेवा नागरिकांना ठाणे ग्रामीणच्या १७ पोलीस ठाण्यांत सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. घरी आलेल्या पोलिसांकडून सौजन्याची वागणूक मिळाल्यानंतर पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत होते. कामात गती येऊन लोकांचाही वेळ वाचतो. शिवाय, कामातही पारदर्शकता येते.- डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण