शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

साकेत पुलावरील जॉइन्टचा भाग निखळला, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

By अजित मांडके | Updated: August 23, 2023 16:04 IST

मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले.

ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील लोंखडी जोडणीच्या भागामधील भाग निखळल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच मनसेने त्याठिकाणी जाऊन आंदोलन करीत याचे गांर्भीय संबधींत यंत्रणेला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्याठिकाणचा भाग निखळला आहे, त्याठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग पुर्ता मंदावल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा थेट तीनहात नाक्यापर्यंत गेल्या होत्या. घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन एमएसआरडीसीच्यावतीने याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पुढील आठ दिवस या कामाला लागणार आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे.

मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले. त्यानुसार या पुलाला ३२ वर्षांचा कालावधी लोटल्याचे बोलले जात आहे. त्यात हा महत्वाचा मार्ग मानला जात असला तरी देखील दर पावसाळ्यात याठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र दिसते. यंदा देखील याठिकाणी मास्टिक टाकून येथील रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास मनसेच्या पदाधिकाऱ्याला येथील जोडणीचा भाग निखळल्याचे दिसून आले. त्यानंतर मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी त्यांनी याठिकाणी आंदोलन करुन सर्वांच्याच ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर याठिकाणी जो भाग निखळला होता. त्याठिकाणी बॅरीकेट्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा थेट तीन हात नाक्यापर्यंत गेल्याचे दिसून आले. दरम्यान, याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाशिकच्या दिशेने जात होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडवून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंते, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि वाहतूक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, पूलाच्या लोखंडी जोडणीमध्ये मोठी भेग पडल्याचे तसेच बेअरिंगचा भाग निखळल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील धोकादायक भागाभोवती अडथळे बसवून त्या भागातील वाहतूक ऐकेरी पद्धतीने सुरू केली.

आठवले यांच्याकडून नियमांचे उल्लंघनकेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या वाहन चालकाने विरुद्ध दिशेने वाहन चालवून प्रवास केला. केंद्रीय मंत्र्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई नाशिक महामार्गावर दुरुस्तीचे काम संबंधित यंत्रणेकडून हाती घेण्यात आले आहे. परंतु त्यासाठी साधारपणे आठ दिवसांचा कालावधी जाणार आहे. परंतु वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. उजवी आणि डावीकडून वाहतुक सुरु ठेवण्यात आली असली तरी नाशिककडे जाणारी वाहतुक एकेरी पद्धतीने सुरु ठेवली जाणार आहे.  डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, मुंबई नाशिक महामार्गावर दुरुस्तीचे काम संबधींत यंत्रणेकडून हाती घेण्यात आले आहे. परंतु त्यासाठी साधारपणे आठ दिवसांचा कालावधी जाणार आहे. परंतु वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. उजवी आणि डावीकडून वाहतुक सुरु ठेवण्यात आली असली तरी नाशिककडे जाणारी वाहतुक एकेरी पध्दतीने सुरु ठेवली जाणार आहे.  - डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

या पुलाखालील बाजूस बेअरींगची समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.(सुभाष बोरसे - कार्यकारी अभियंता, एमसआरडीसी)

साकेत पूलाची स्थिती भयंकर आहे. हा पूल कोसळल्यास अनेक अपघात होऊ शकतात. त्यामुळे पूलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री 

टॅग्स :thaneठाणे