शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

भातसा नदीवरील पुलाचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:30 IST

ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे.

कल्याण : पावसामुळे खडवलीनजीक वालकस-बेहरे गावाकडे जाणाऱ्या भातसा नदीवरील जुन्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे जीवघेणे झाले आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे. आतापर्यंत त्याची डागडुजी करण्यात आली, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. यंदाही पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. पूल कमी उंचीचा आहे. पुलाचा भाग कोसळल्याने त्यावरून ग्रामस्थ जीव मुठीत धरून येजा करत आहेत. भविष्यात संपूर्ण पूल नदीच्या पात्रात कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. पुलाबरोबर वालकस व बेहरे गावाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ताही तातडीने तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून रस्ता व पुलाची दुरुस्ती करावी, याकडे लक्ष वेधले आहे.