शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भातसा नदीवरील पुलाचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:30 IST

ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे.

कल्याण : पावसामुळे खडवलीनजीक वालकस-बेहरे गावाकडे जाणाऱ्या भातसा नदीवरील जुन्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे जीवघेणे झाले आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे. आतापर्यंत त्याची डागडुजी करण्यात आली, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. यंदाही पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. पूल कमी उंचीचा आहे. पुलाचा भाग कोसळल्याने त्यावरून ग्रामस्थ जीव मुठीत धरून येजा करत आहेत. भविष्यात संपूर्ण पूल नदीच्या पात्रात कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. पुलाबरोबर वालकस व बेहरे गावाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ताही तातडीने तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून रस्ता व पुलाची दुरुस्ती करावी, याकडे लक्ष वेधले आहे.