शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

खासदारांच्या दौैऱ्याचे फलित शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:26 IST

कल्याणमधील वास्तव : स्कायवॉकवर फेरीवाले, कचऱ्याचे साम्राज्य कायम

कल्याण : भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाºया कल्याण पश्चिमेकडील रेल्वेस्थानकातील स्कायवॉकची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी तेथील कचºयाचे साम्राज्य पाहता केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयाच्या वेळी गायब झालेल्या फेरीवाले येथे बिनदिक्कतपणे पुन्हा व्यवसाय करू लागले आहेत. परिणामी, त्यांच्याकडून होणाºया कचºयामुळे स्कायवॉकवर बकाल अवस्था पाहायला मिळत आहे.

रेल्वेस्थानक परिसरातील केडीएमसीचा स्कायवॉक हा पादचारी आणि प्रवाशांसाठी बांधण्यात आला असलातरी महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. आयुक्तांसह सत्ताधाºयांनीही या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर फेरीवाल्यांसह भिकारी, गर्दुल्ले, वारांगना यांचाही वावर सातत्याने असतो. स्कायवॉकवर अस्वच्छतेचे सम्राज्यही असते. एकप्रकारे हा स्कायवॉक त्यांना आंदण दिल्याचे चित्र पाटील यांच्या दौºयानंतरही पाहायला मिळत आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अस्वच्छता यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींवरून पाटील यांनी रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत पश्चिमेतील स्कायवॉकची पाहणी केली. यावेळी खासदारांसमवेत आमदार नरेंद्र पवार हेदेखील होते. खासदारांचा दौरा होणार, याची माहिती मिळताच फेरीवाले गायब झाले होते. मात्र, पाटील यांना दौºयादरम्यान स्कायवॉकवर अस्वच्छतेचे दर्शन घडल्याने त्यांनी प्रभाग अधिकारी पवार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी मोबाइलवर आलेल्या तक्रारी आणि फोटोही खासदारांनी त्यांना दाखवले होते. पाटील यांनी दौºयात प्रवाशांशीही संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या.स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि गर्दुल्ल्यांचा, भिकाºयांचा प्रवासी व पादचाºयांना होणारा त्रास पाहता अधिकारी आणि पोलीस यांची विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले होते.

तर, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे आदेशही संबंधित अधिकाºयांना पाटील यांनी दिले होते. परंतु, दौरा होऊनही स्कायवॉकवरची परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याचे पाहायला मिळत आहे.फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या कचºयाचे चित्र पाहता खासदारांच्या दौºयाने काय साधले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.