शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

खासदारांच्या दौैऱ्याचे फलित शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:26 IST

कल्याणमधील वास्तव : स्कायवॉकवर फेरीवाले, कचऱ्याचे साम्राज्य कायम

कल्याण : भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाºया कल्याण पश्चिमेकडील रेल्वेस्थानकातील स्कायवॉकची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी तेथील कचºयाचे साम्राज्य पाहता केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयाच्या वेळी गायब झालेल्या फेरीवाले येथे बिनदिक्कतपणे पुन्हा व्यवसाय करू लागले आहेत. परिणामी, त्यांच्याकडून होणाºया कचºयामुळे स्कायवॉकवर बकाल अवस्था पाहायला मिळत आहे.

रेल्वेस्थानक परिसरातील केडीएमसीचा स्कायवॉक हा पादचारी आणि प्रवाशांसाठी बांधण्यात आला असलातरी महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. आयुक्तांसह सत्ताधाºयांनीही या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर फेरीवाल्यांसह भिकारी, गर्दुल्ले, वारांगना यांचाही वावर सातत्याने असतो. स्कायवॉकवर अस्वच्छतेचे सम्राज्यही असते. एकप्रकारे हा स्कायवॉक त्यांना आंदण दिल्याचे चित्र पाटील यांच्या दौºयानंतरही पाहायला मिळत आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अस्वच्छता यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींवरून पाटील यांनी रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत पश्चिमेतील स्कायवॉकची पाहणी केली. यावेळी खासदारांसमवेत आमदार नरेंद्र पवार हेदेखील होते. खासदारांचा दौरा होणार, याची माहिती मिळताच फेरीवाले गायब झाले होते. मात्र, पाटील यांना दौºयादरम्यान स्कायवॉकवर अस्वच्छतेचे दर्शन घडल्याने त्यांनी प्रभाग अधिकारी पवार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी मोबाइलवर आलेल्या तक्रारी आणि फोटोही खासदारांनी त्यांना दाखवले होते. पाटील यांनी दौºयात प्रवाशांशीही संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या.स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि गर्दुल्ल्यांचा, भिकाºयांचा प्रवासी व पादचाºयांना होणारा त्रास पाहता अधिकारी आणि पोलीस यांची विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले होते.

तर, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे आदेशही संबंधित अधिकाºयांना पाटील यांनी दिले होते. परंतु, दौरा होऊनही स्कायवॉकवरची परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याचे पाहायला मिळत आहे.फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या कचºयाचे चित्र पाहता खासदारांच्या दौºयाने काय साधले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.