शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

प्रवाशांना लुटणे हाच रिक्षाचालकांचा धंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:41 IST

रिक्षा किंवा रिक्षाचालकांकडून होणारी लूट हा प्रश्न कुणा एका शहरापुरता राहिलेला नाही. तो सगळ््या ठिकाणी आहे. आपली लूट होते हे माहित असूनही प्रवासी किंवा सर्वसामान्य नागरिक काहीच करू शकत नाही.

रिक्षा किंवा रिक्षाचालकांकडून होणारी लूट हा प्रश्न कुणा एका शहरापुरता राहिलेला नाही. तो सगळ््या ठिकाणी आहे. आपली लूट होते हे माहित असूनही प्रवासी किंवा सर्वसामान्य नागरिक काहीच करू शकत नाही. फार तर तो पोलिसांकडे तक्रार करेल. मात्र या तक्रारीचा परिणाम होणार नाही, हे त्यालाही माहित असते. अगदीच प्रवाशांनी आंदोलन केले, तर तेवढ्यापुरती कारवाई होते. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या...मूळात वाहतूक पोलीस, आरटीओ हे कठोर पावले उचलत नाहीत. दुसरे म्हणजे राजकीय हस्तक्षेपामुळे कुठल्याही शहरातील परिवहन सेवा सक्षम नाही. ती जर सक्षम असती, तर प्रवाशांना रिक्षाचालकांची मुजोरी सहन करावी लागली नसती. पण दुर्देवाने आपल्याकडे रिक्षा संघटनाही राजकीय पक्षांच्याच आहेत. त्यांचीच परिवहनमध्ये संघटना असल्याने सगळे सांभाळून घेतले जाते. परिवहन सेवा सुरू केल्यास आमच्या पोटावर पाय येईल, असे साकडे रिक्षाचालक या संघटनांना घालतात. प्रवाशांनी बससेवेची मागणी केल्यास रिक्षाचालक बसचालकाला, वाहकाला मारहाण करतात आम्ही कशा बस चालवणार असा प्रश्न संघटनांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे लूट सहन करतच प्रवास करावा लागतो. नियम धाब्यावर बसवणे हा तर रिक्षाचालकांचा हक्कच झाला आहे. जोपर्यंत चिरीमिरी देणे थांबत नाही तोपर्यंत रिक्षाचे मीटर डाऊनच राहणार आणि प्रवासांचा खिसा कापला जाणार हे निश्चित.काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहराची दिवसेंदिवस बदनामी होत आहे. शहरात बहुतांश ठिकाणी मीटरवर रिक्षा धावत नसल्याने शेअर रिक्षाचा बोलबाला आहे. त्यातही शेअर रिक्षाचालकांनी नियम धाब्यावर बसवायचे अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. तीन प्रवासी घेण्याची पारवानगी असताना बिनधास्त चौथा प्रवासी घेतला जातो. चालकाच्या बाजूला त्याला बसवले जाते. उद्या जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? ज्यावेळेस पोलीस तापसणीसाठी उभे असतात तेव्हा तीनच प्रवासी घेतले जातात. प्रसंगी चालक एकमेकांना पोलीस उभे असल्याची माहितीही देतात. १५ वर्ष झालेल्या भंगार रिक्षाही ठाण्याच्या रस्त्यावर धावत आहेत. पण आरटीओ, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. परिवहन सेवा चांगली नसल्याने प्रवाशाला नाईलाजास्तव रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. परिणामी लूट डोळ््यासमोर दिसत असली तरी तो हतबल झालेला असतो. त्यातही चौथा प्रवासी, भंगार रिक्षातून प्रवास म्हणजे रोजच मृत्यूची टांगती तलवार घेऊनच तो ये-जा करत असतो. हा सर्व प्रकार राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नवीन रिक्षा चालक-मालक संघटनांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू असतो.अलिकडे रिक्षाचालकांकडून महिलांचा विनयभंग होणे, महिला प्रवाशाला मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाने अक्षरश: कळस गाठला आहे. त्यातच, घोडबंदरला जाणाºया प्रवाशांची ठाणे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली दिवसाढवळ््या रिक्षाचालकांकडून सर्रास लूट सुरू असते. पादचारी पुलाच्या ठिकाणी रिक्षाचालक घोळक्याने उभे असतात आणि आपले सावज शोधत असतात. वास्तविक ज्याठिकाणी हे रिक्षाचालक उभे असतात तेथून हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलिसांची शाखा आहे. फार कमीवेळी येथे पोलीस उभे असलेले दिसतात. रिक्षातळावरील प्रवाशांची मोठी रांग दाखवून बाहेरून आलेल्या प्रवाशाच्या मनात धडकी भरवतात. शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे मीटरनुसार गेलात तर २० रुपये अधिक द्यावे लागतील, अशी कारणे सांगत रिक्षाचालक प्रवाशांना ‘लक्ष्य’ करतात. उघडउघड ही फसवणूक सुरू आहे. फलाट क्रमांक १ आणि २ च्यामध्ये शिवाय दोनच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वारापाशी दिवसभर बेकायदा रिक्षा उभ्या करून चालक आपली शिकार शोधत असतात.