शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 9, 2022 13:44 IST

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे.

ठाणे : सध्या फॉरवर्डच्या काळात तरुण पिढीचे शब्दांशी नातं तुटत आहे. दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या नावाने होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा शब्दांशी नाते जोडले जाईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. दरम्यान, कै. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात पराग बद्रिके व कनिष्ठ गटात अनन्या म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दहा हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. 

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील के. बी. पी. महाविद्यालयात भरविलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा समारोप झाला. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुगदरे, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, मंदार टिल्लू आदींनी काम पाहिले. या स्पर्धेत वरिष्ठ गटात यश पाटील याने द्वीतीय, श्रुती बोरस्तेने तृतीय आणि विवेक वारभुवन याने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले तर कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकावर रागिणी भोसले, तृतीय क्रमांकावर प्रियांका दळवी आणि उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी माने यांना बक्षीस देण्यात आले.

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे. तर पाच ते सहापट ऐकले पाहिजे. वक्तृत्वासाठी आत्मविश्वासही महत्वाचा असून, शब्दांची मांडणीही योग्य पद्धतीने करावी, अशी सुचना उपाध्ये यांनी तरुणांना केली. प्रत्येक भाषणाच्या वेळी आपल्या समोर जनसमुदाय कोणत्या पद्धतीचा आहे. ते ध्यानात घेण्याबरोबरच सखोल अभ्यास करून भाषण करावे. अशा पद्धतीने तुम्हा वक्तृत्वात यश मिळेल, असे उपाध्ये यांनी सांगितले.

महाविद्यालयातील तरुण-तरुणींना मनातील विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देण्याचा मुख्य उद्देश ठेवून स्पर्धा भरविण्यात आली होती. उत्तम वक्तृत्वाच्या माध्यमातून मुलांना भविष्य घडविता येऊ शकते. यापुढील काळातही समन्वय प्रतिष्ठानतर्फे तरुणांच्या प्रगतीसाठी स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी संजीव नाईक, माधवी नाईक यांचीही भाषणे झाली. आकाश राऊत यांनी सुत्रसंचालन व स्पर्धेचे नियोजन केले. 

'वसंतराव डावखरेंनी अनेक वक्ते घडविले'

विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर कार्य करीत असताना वसंतराव डावखरे यांनी सभागृहातून अनेक यशस्वी वक्ते घडविले. एखादा आमदार चांगल्या पद्धतीने बोलत असल्यास, त्याला ते भाषणासाठी वेळ वाढवून देत असत. तर एखादा सदस्य मुद्द्यावरून भरकटला, तर ताबडतोब विषय थांबवित असत. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक नवोदीत आमदारांना आत्मविश्वास वाढला होता, अशी आठवण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी वसंतराव डावखरेंच्या भाषणाचे वैशिष्ट्य नमूद केले. सभा असो वा बैठक, ते बोलताना सर्व समुदायाला सामावून घेत होते. त्यामुळे त्यांचे भाषण लोकांच्या मनाला भिडत होते, असे म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे