शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 9, 2022 13:44 IST

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे.

ठाणे : सध्या फॉरवर्डच्या काळात तरुण पिढीचे शब्दांशी नातं तुटत आहे. दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या नावाने होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा शब्दांशी नाते जोडले जाईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. दरम्यान, कै. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात पराग बद्रिके व कनिष्ठ गटात अनन्या म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दहा हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. 

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील के. बी. पी. महाविद्यालयात भरविलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा समारोप झाला. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुगदरे, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, मंदार टिल्लू आदींनी काम पाहिले. या स्पर्धेत वरिष्ठ गटात यश पाटील याने द्वीतीय, श्रुती बोरस्तेने तृतीय आणि विवेक वारभुवन याने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले तर कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकावर रागिणी भोसले, तृतीय क्रमांकावर प्रियांका दळवी आणि उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी माने यांना बक्षीस देण्यात आले.

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे. तर पाच ते सहापट ऐकले पाहिजे. वक्तृत्वासाठी आत्मविश्वासही महत्वाचा असून, शब्दांची मांडणीही योग्य पद्धतीने करावी, अशी सुचना उपाध्ये यांनी तरुणांना केली. प्रत्येक भाषणाच्या वेळी आपल्या समोर जनसमुदाय कोणत्या पद्धतीचा आहे. ते ध्यानात घेण्याबरोबरच सखोल अभ्यास करून भाषण करावे. अशा पद्धतीने तुम्हा वक्तृत्वात यश मिळेल, असे उपाध्ये यांनी सांगितले.

महाविद्यालयातील तरुण-तरुणींना मनातील विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देण्याचा मुख्य उद्देश ठेवून स्पर्धा भरविण्यात आली होती. उत्तम वक्तृत्वाच्या माध्यमातून मुलांना भविष्य घडविता येऊ शकते. यापुढील काळातही समन्वय प्रतिष्ठानतर्फे तरुणांच्या प्रगतीसाठी स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी संजीव नाईक, माधवी नाईक यांचीही भाषणे झाली. आकाश राऊत यांनी सुत्रसंचालन व स्पर्धेचे नियोजन केले. 

'वसंतराव डावखरेंनी अनेक वक्ते घडविले'

विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर कार्य करीत असताना वसंतराव डावखरे यांनी सभागृहातून अनेक यशस्वी वक्ते घडविले. एखादा आमदार चांगल्या पद्धतीने बोलत असल्यास, त्याला ते भाषणासाठी वेळ वाढवून देत असत. तर एखादा सदस्य मुद्द्यावरून भरकटला, तर ताबडतोब विषय थांबवित असत. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक नवोदीत आमदारांना आत्मविश्वास वाढला होता, अशी आठवण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी वसंतराव डावखरेंच्या भाषणाचे वैशिष्ट्य नमूद केले. सभा असो वा बैठक, ते बोलताना सर्व समुदायाला सामावून घेत होते. त्यामुळे त्यांचे भाषण लोकांच्या मनाला भिडत होते, असे म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे