शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

जातपडताळणीसाठी होतेय परवड

By admin | Updated: June 2, 2017 04:50 IST

पालघर जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयातील कारभार अतिशय संथगतीने सुुरु असल्याने जात पडताळणीची कामे रखडून

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पालघर जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयातील कारभार अतिशय संथगतीने सुुरु असल्याने जात पडताळणीची कामे रखडून पडली आहेत. त्यामुळे जातीचे दाखल मिळवणे आणि त्याची पडताळणी करणे यासाठी शेकडो पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी तक्रार सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या जात पडताळणीसाठी सरकारने २१ आॅक्टोबर २०१६ पासून कार्यालय सुुरु केले आहे. या कार्यालयातील कारभार अतिशय संथ गतीने सुरु असल्याने जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळणे अवघड होऊन बसले आहे. पूर्वी वसई तालुक्यातील रहिवशांना जातीचे दाखले भिवंडी प्रांत कार्यालयातून घ्यावे लागत होते. त्याची पडताळणी कोकण भवन येथे जाऊन करावी लागत असे. आता वसई प्रांत कार्यालयातून मिळालेल्या दाखल्यांची पडताळणी पालघर येथून करावी लागते आहे. पूर्वीच्या दाखल्यांची पडताळणी आजही कोकण भवन येथूनच करावी लागत असल्याने लोकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पालघर कार्यालयात आजपर्यंत सुमारे अडीच हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील जेमतेम सहाशे प्रकरणात दाखले दिले गेले आहेत. सहाशे प्रकरणे उत्तरासाठी तर सहाशे पेक्ष अधिक प्रकरणे अध्यक्ष आणि उपाध्याक्षांच्या सह्यांसाठी प्रलंबित राहिली आहेत. तर नव्याने आणखी तीनशे प्रकरणे दाखल झाली आहेत. या कार्यालयातील कामाचा वेग अतिशय मंद असल्याने प्रकरणांचा निपटारा लवकर होत नाही आणि लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे. पालघर जिल्हयातील शेकडो नागरीकांना जातीचे दाखले मिळालेले नाहीत. ज्यांना मिळालेले आहेत त्यांची पडताळणी होत नाही. जूनमध्ये शाळा-कॉलेज प्रवेश सुरु होत असून त्यावेळी जातीचे दाखले व पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पडताळणी कार्यालयाच्या कामाची गती वाढवावी अशी त्यांची मागणी आहे.