शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणीसाठी होतेय परवड

By admin | Updated: June 2, 2017 04:50 IST

पालघर जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयातील कारभार अतिशय संथगतीने सुुरु असल्याने जात पडताळणीची कामे रखडून

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पालघर जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयातील कारभार अतिशय संथगतीने सुुरु असल्याने जात पडताळणीची कामे रखडून पडली आहेत. त्यामुळे जातीचे दाखल मिळवणे आणि त्याची पडताळणी करणे यासाठी शेकडो पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी तक्रार सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या जात पडताळणीसाठी सरकारने २१ आॅक्टोबर २०१६ पासून कार्यालय सुुरु केले आहे. या कार्यालयातील कारभार अतिशय संथ गतीने सुरु असल्याने जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळणे अवघड होऊन बसले आहे. पूर्वी वसई तालुक्यातील रहिवशांना जातीचे दाखले भिवंडी प्रांत कार्यालयातून घ्यावे लागत होते. त्याची पडताळणी कोकण भवन येथे जाऊन करावी लागत असे. आता वसई प्रांत कार्यालयातून मिळालेल्या दाखल्यांची पडताळणी पालघर येथून करावी लागते आहे. पूर्वीच्या दाखल्यांची पडताळणी आजही कोकण भवन येथूनच करावी लागत असल्याने लोकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पालघर कार्यालयात आजपर्यंत सुमारे अडीच हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील जेमतेम सहाशे प्रकरणात दाखले दिले गेले आहेत. सहाशे प्रकरणे उत्तरासाठी तर सहाशे पेक्ष अधिक प्रकरणे अध्यक्ष आणि उपाध्याक्षांच्या सह्यांसाठी प्रलंबित राहिली आहेत. तर नव्याने आणखी तीनशे प्रकरणे दाखल झाली आहेत. या कार्यालयातील कामाचा वेग अतिशय मंद असल्याने प्रकरणांचा निपटारा लवकर होत नाही आणि लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे. पालघर जिल्हयातील शेकडो नागरीकांना जातीचे दाखले मिळालेले नाहीत. ज्यांना मिळालेले आहेत त्यांची पडताळणी होत नाही. जूनमध्ये शाळा-कॉलेज प्रवेश सुरु होत असून त्यावेळी जातीचे दाखले व पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पडताळणी कार्यालयाच्या कामाची गती वाढवावी अशी त्यांची मागणी आहे.