शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पप्पू का बेटा भी फेल हो गया...

By admin | Updated: February 24, 2017 05:54 IST

सिंधी भाषक राजकारणाला चुचकारण्यासाठी त्या समाजातील नामचीन व्यक्तींना सोबत

मिलिंद बेल्हे / उल्हासनगरसिंधी भाषक राजकारणाला चुचकारण्यासाठी त्या समाजातील नामचीन व्यक्तींना सोबत घेऊनही एकहाती सत्ता मिळत नाही, याचा धडा उल्हासनगरने भाजपाला दिला. त्यामुळे आधी पप्पू कलानी यांचा पराभव करणाऱ्या भाजपावर त्यांचा मुलगा पदरात घेऊनही फेल होण्याची वेळ आली. उल्हासनगरात मोठा भाऊ होण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ओमी कलानी आणि त्यांची टीम पक्षात घेतली. त्यातून एकहाती सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण त्याला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि जीवन इदनानी यांच्या साई पक्षाने शह दिला. ज्या सिंधी पक्षाच्या राजकारणाचा आधार भाजपाने घेतला, त्याच सिंधी समाजाला शिवसेनेनेही सामावून घेतले. साई पक्षाचा आधारच हा समाज आहे. त्यामुळे एकाच समाजाच्या बळावर राजकारण करता येत नाही आणि त्यांच्याच अस्मितांवर फुंकर घालत संपूर्ण शहराचे राजकारण करता येत नाही, याचाही धडा यातून राष्ट्रीय म्हणवणाऱ्या या पक्षाला मिळाला. या फोडाफोडीतून भाजपाने ११ वरून एकदम ३३ पर्यंत मजल मारली असली, तरी त्यांच्यासोबत फक्त भारिप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे दोन सदस्य असल्याने, ते सत्तेसाठी ४० चा आकडा गाठू शकत नाहीत. सेनेनेही २५ ची संख्या गाठली असली, तरी त्यांना फक्त रिपाइंच्या आठवले गटाच्या दोन सदस्यांची सोबत आहे. त्यामुळे साई पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पक्षात मोठी फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस गलितगात्र झाला होता आणि काँग्रेसलाही विजयाची फारशी आशा नव्हती.भाजपासोबत फक्त भारिप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे दोन सदस्य असल्याने ते सत्तेसाठी ४० चा जादुई आकडा गाठू शकत नाहीत.साई पक्षाची सद्दी संपवणार?भाजपा किंवा शिवसेनेसारख्या एकाच पक्षाला बहुमत नसल्याने, साई पक्षासारख्या छोट्या पक्षांना पाच वर्षे सांभाळायचे; सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती द्यायच्या की, मुंबईच्या समीकरणांची वाट पाहायची, हे भाजपा आणि शिवसेनेला ठरवावे लागणार आहे. तसे झाले तर साई पक्षाची सद्दी संपेल.सत्तेसाठी राजकीय कडबोळे करावे लागल्याने, गेल्या १० वर्षांत उल्हासनगरच्या विकासाची वाट लागली आहे. त्यामुळे किती छोटे पक्ष, त्यांच्या अटी आणि तडजोडी सहन करायच्या, याचा निर्णय भाजपा आणि शिवसेनेला घ्यावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांना एकत्र आल्याखेरीज सत्ता स्थापन करता येणार नाही, असाच या निकालाचा साधा अर्थ आहे.