शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पोलिस, रेल्वेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट; नागरी समस्यांमध्ये पडली लैंगिक अत्याचाराची ठिणगी

By पंकज पाटील | Updated: August 21, 2024 06:31 IST

खोपोली, कर्जतवरून येणाऱ्या लोकल भरगच्च भरलेल्या असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना बरेचदा त्यात प्रवेश करता येत नाही.

- पंकज पाटील 

बदलापूर : बदलापुरात दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने बदलापुरातील नागरिकांच्या मनात वर्षानुवर्षे खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला. दररोज होणारी लोकलची रखडपट्टी व गर्दीमुळे होणारे हाल, अनेक भागात पाण्याची टंचाई, पावसाळ्यात साचणारे पाणी, रस्त्यांवरील खड्डे, रिक्षाचालकांची मनमानी, फेरीवाल्यांची मुजोरी, स्थानिक नेत्यांची बेफिकिरी, पोलिसांची बेपर्वाई अशा असंख्य कारणांमुळे बदलापूरमधील रहिवाशांच्या मनात संताप धुमसत होता. 

डोंबिवलीनंतर मराठमोळ्या रहिवाशांचे शहर ही ओळख असलेल्या बदलापुरात रेल्वेपासून नगरपालिकेपर्यंत अनेक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. केवळ तुलनेने स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून लोक बदलापूरमध्ये येतात. कर्जत, नेरळ वगैरे भागातील घरे विकून काहींनी बदलापूरला पसंती दिली. मात्र, हालअपेष्टा संपलेल्या नाही. बदलापुरातून हजारो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, अंबरनाथमधून प्रवासी उलटे बसून बदलापूर लोकलमधून येत असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना उभे राहावे लागते. 

खोपोली, कर्जतवरून येणाऱ्या लोकल भरगच्च भरलेल्या असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना बरेचदा त्यात प्रवेश करता येत नाही. लोकलचा कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान होणारा खोळंबा जीवघेणा असतो. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या स्थानकात लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यात नोकरी करणाऱ्यांना डोंबिवली स्थानकात उतरता येत नाही. बदलापूरकर प्रवाशांच्या या समस्यांची कुणीच दखल घेत नाही. वर्षभरापूर्वी सीएसएमटीवरून येणारी साधी लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू केल्याने बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.

तपासासाठी याचिका लैंगिक अत्याचारप्रकरणाच्या तपासासाठी सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) तपास न्यायालयीन देखरेखेखाली करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात अॅड. अजिंक्य गायकवाड यांनी दाखल केली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. मात्र न्यायालयाने या याचिकेवर एकलपीठापुढे नाही, तर खंडपीठापुढे सुनावणी होऊ शकते, असे म्हणत सुनावणी घेण्यास नकार दिला.

फलाटावर अपुऱ्या सुविधा स्टेशन परिसरातील पार्किंगचा घोळ, रिक्षा स्टॅन्डचा घोळ यामुळे घर गाठेपर्यंत रहिवाशांची दमछाक होते. बदलापूरमधील रस्त्यांना खड्डे असून अनेक भागात रस्त्यांवर दिवे नसतात. पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूरमधील पूररेषाच्या आत असलेल्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे बदलापूरकर प्रचंड संतापले होते. सोनसाखळी चोरी व अन्य गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या गैरकारभाराबद्दल नाराजी होतीच. दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व त्या प्रकरणात गुन्हा दाखल करताना झालेली बेफिकीरी यामुळे रोष व रेल्वेच्या हालअपेष्टांबद्दलचा संताप असा बाहेर पडल्याची चर्चा आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर