शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

पॅनेल पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा टांगा पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

अंबरनाथ/बदलापूर : गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तेवढाच कालावधी निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना आता ...

अंबरनाथ/बदलापूर : गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तेवढाच कालावधी निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना आता पॅनल पद्धतीचा मोठा फटका बसणार आहे. पॅनल पद्धतीमुळे प्रभागाची रचना आणि त्याचे आरक्षण देखील बदलण्याची शक्यता असल्यामुळे आता अनेक इच्छुक उमेदवार बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्याच काळात कोरोनाची पहिली लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुका कधीही होतील या आशेवर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात कोरोना काळातदेखील मोठ्या प्रमाणात कामे केली. अर्थात त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आर्थिक भारही सोसावा लागला. हा आर्थिक भार सोसत पुन्हा मार्च २०२१ मध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने काम सुरू केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्या निवडणुकाही स्थगित करण्याची वेळ राज्य शासनावर आली. मात्र त्या दीड वर्षात इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात खर्च केला होता. दोन वेळा निवडणुका पुढे सरकल्याने या खर्चाचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल की नाही? असा प्रश्न सर्व इच्छुक उमेदवारांसमोर आहे.

आता राज्य शासनाने एक सदस्य पद्धत रद्द करून द्विसदस्यीय पद्धतीने अर्थात पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका अंबरनाथ आणि बदलापुरातील इच्छुक उमेदवारांना बसणार आहे. इच्छुक उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे आरक्षणामुळे इतर प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी गेले होते. त्यामुळे नव्या निवडणूक प्रक्रियेमुळे पुन्हा आरक्षण बदलण्याची आणि प्रभागरचना बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका हा इच्छुक उमेदवारांना बसणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पॅनेल पद्धतीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे अंबरनाथमधील भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी या निर्णयामुळे भाजपला काहीएक फरक पडणार नाही आणि भाजपला पूर्ण यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

-----------

निवडणूक आयाेगाच्या आदेशाची प्रतीक्षा

- राज्य शासनाने पॅनल पद्धत निश्चित केली असली तरी ज्या पालिकांच्या निवडणुका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यांना हा आदेश लागू होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षण सोडत आणि मतदारयाद्यांचेही काम झाले होते. त्यामुळे या आधीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द होणार की अस्तित्वातील प्रभागरचनेवरच पॅनल पद्धतीने निवडणुका घेणार, याबाबत निवडणूक आयोगाला आदेश काढावे लागणार आहेत.

- प्रत्यक्ष पॅनल पद्धत असल्यामुळे प्रभागांची रचना आणि प्रभागांच्या आरक्षण सोडत या नव्या पद्धतीने घेतल्या जाण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.