शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

पॅनेल पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा टांगा पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

अंबरनाथ/बदलापूर : गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तेवढाच कालावधी निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना आता ...

अंबरनाथ/बदलापूर : गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तेवढाच कालावधी निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना आता पॅनल पद्धतीचा मोठा फटका बसणार आहे. पॅनल पद्धतीमुळे प्रभागाची रचना आणि त्याचे आरक्षण देखील बदलण्याची शक्यता असल्यामुळे आता अनेक इच्छुक उमेदवार बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्याच काळात कोरोनाची पहिली लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुका कधीही होतील या आशेवर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात कोरोना काळातदेखील मोठ्या प्रमाणात कामे केली. अर्थात त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आर्थिक भारही सोसावा लागला. हा आर्थिक भार सोसत पुन्हा मार्च २०२१ मध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने काम सुरू केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्या निवडणुकाही स्थगित करण्याची वेळ राज्य शासनावर आली. मात्र त्या दीड वर्षात इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात खर्च केला होता. दोन वेळा निवडणुका पुढे सरकल्याने या खर्चाचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल की नाही? असा प्रश्न सर्व इच्छुक उमेदवारांसमोर आहे.

आता राज्य शासनाने एक सदस्य पद्धत रद्द करून द्विसदस्यीय पद्धतीने अर्थात पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका अंबरनाथ आणि बदलापुरातील इच्छुक उमेदवारांना बसणार आहे. इच्छुक उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे आरक्षणामुळे इतर प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी गेले होते. त्यामुळे नव्या निवडणूक प्रक्रियेमुळे पुन्हा आरक्षण बदलण्याची आणि प्रभागरचना बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका हा इच्छुक उमेदवारांना बसणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पॅनेल पद्धतीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे अंबरनाथमधील भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी या निर्णयामुळे भाजपला काहीएक फरक पडणार नाही आणि भाजपला पूर्ण यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

-----------

निवडणूक आयाेगाच्या आदेशाची प्रतीक्षा

- राज्य शासनाने पॅनल पद्धत निश्चित केली असली तरी ज्या पालिकांच्या निवडणुका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यांना हा आदेश लागू होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षण सोडत आणि मतदारयाद्यांचेही काम झाले होते. त्यामुळे या आधीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द होणार की अस्तित्वातील प्रभागरचनेवरच पॅनल पद्धतीने निवडणुका घेणार, याबाबत निवडणूक आयोगाला आदेश काढावे लागणार आहेत.

- प्रत्यक्ष पॅनल पद्धत असल्यामुळे प्रभागांची रचना आणि प्रभागांच्या आरक्षण सोडत या नव्या पद्धतीने घेतल्या जाण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.