शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फेरीवाल्यांविरोधात बदलापूरमध्ये पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:04 IST

व्यापारी त्रस्त : सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहतुकीलाही अडथळा

बदलापूर : लॉकडाऊनच्या काळात रस्ते आणि चौक गिळंकृत करणाऱ्या फेरीवाल्यांच्या अरेरावीविरुद्ध गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत निषेध व्यक्त केला. गेल्या आठवड्यात एका दुकानासमोर बसलेल्या विक्रेत्याला रस्ता देण्याची मागणी करणाºया दुकानदाला विक्रेत्याने शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या बेकायदा अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी करत व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती. व्यापाºयांनी इशारा देऊनही पालिका प्रशासनाने अद्याप याप्रकरणी तोडगा काढलेला नाही.

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. याकाळात गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडई बंद करून पालिका प्रशासनाच्या सहकार्याने फळे, भाजीविक्रेत्यांना शहरातील विविध चौकांत, रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करण्याची मुभा दिली होती. मात्र, गेल्या सात महिन्यांत विविध चौक, रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. सध्या अनलॉकनंतर शिथिलता आणत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शहरातील गर्दीच्या चौकात वर्दळ वाढली आहे. यापूर्वी बसलेले भाजी आणि फळविक्रेते अजूनही त्याच ठिकाणी बस्तान मांडून असून पालिका प्रशासनाने वाहतूक, गर्दीकडे दुर्लक्ष करत अजूनही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिक, वाहतूक आणि व्यापाºयांना बसत आहे. बदलापूर पश्चिमेतील स्थानक परिसरात दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसतात.

याप्रकरणी पश्चिमेतील बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाने प्रशासनाकडे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच १ आॅक्टोबरपर्यंत कारवाई न झाल्यास बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, नगरपालिका प्रशासन आता या फेरीवाल्यांविरोधात कुठली कारवाई करते याकडे शहरातील व्यापारी, नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :thaneठाणे