शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पालघरच्या शिक्षकांना घरवापसीची दारे झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेकडून पालघर जिल्ह्यातील विकल्प विपरीत शिक्षकांना बिंदुनामावलीनुसार टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात ...

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेकडून पालघर जिल्ह्यातील विकल्प विपरीत शिक्षकांना बिंदुनामावलीनुसार टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात अ. ज, इ. मा.व, खुल्या संवर्गातील एक हजार ३९९ शिक्षक अतिरिक्त बिंदूवर काम करत आहेत. यात पालघर जिल्ह्यात कार्यरत विकल्प विपरित शिक्षकांना आता ठाणे जिल्ह्यात परतीचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. कारण परतीसाठी सेवाज्येष्ठता हा निकष डावलून ठाणे जिल्हा परिषदेने अवलंबिलेल्या चुकीच्या कार्यवाहीविरुद्ध आंदोलनाचा इशारा विकल्प विपरित संघर्ष समितीने कोकण आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर नवनिर्मित पालघर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी २०१८ मध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७० शिक्षकांना त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या विरोधात तात्पुरत्या स्वरूपात पालघर जिल्ह्यात समायोजित केले होते. ते करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठाणे जिल्ह्यात कायम ठेवली आहे; मात्र ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सेवाज्येष्ठता यादीत पालघरमधील कार्यरत या शिक्षकांचाही समावेश केलेला आहे. पालघर जिल्ह्यात १६६ शिक्षकांची नव्याने भरती झाल्याने ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आपल्याकडील रिक्त असलेल्या ५७ पदानुसार शिक्षकांची पालघर जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेत एससी, ओबीसी, खुल्या संवर्गातील एक हजार ३९९ शिक्षक अतिरिक्त बिंदूवर काम करत असल्याने फक्त एसटी,व भ.ज-ड संवर्गातीलच शिक्षकांची मागणी पालघर जिल्हा परिषदेकडे केल्याने एस टी. वगळता इतर सर्व संवर्गातील पालघर जिल्ह्यात कार्यरत विकल्प विपरित शिक्षकांना ठाण्यात परतीची दारे बंद झाली असून सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना आता पालघरमध्येच थांबावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेची चुकीची कार्यवाही

२९ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार विकल्प प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंतरजिल्हा बदली किंवा नव्याने भरती प्रक्रियेस बंदी असताना ठाणे जिल्हा परिषदेने २७ आंतर जिल्हा बदली शिक्षकांना हजर करून घेतले. विकल्प विपरितांचे सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन न करता बिंदुनामावलीनुसार आग्रह धरला आहे.

......

"आपल्याच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना बिंदू शिल्लक नसल्याचे कारण दाखवून लटकावून ठेवायचे. परंतु, शासन निर्णयात बंदी असतानाही बिंदू शिल्लक नसताना आंतर जिल्हा बदली शिक्षकांना हजर करून घेतले. प्राथमिक शिक्षण विभागाने आपली आडमुठी भूमिका न सोडल्यास आंदोलनाबरोबरच उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू.

धनंजय धानके - अध्यक्ष -विकल्प विपरित संघर्ष समिती ठाणे -पालघर.