शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पालघर : शिवसेनेचे १८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

By admin | Updated: May 30, 2017 05:11 IST

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यात सेनेला यश आले आहे. ४ ग्रा.पं. बविआ, १ भाजप, १ ग्रामविकास

हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यात सेनेला यश आले आहे. ४ ग्रा.पं. बविआ, १ भाजप, १ ग्रामविकास समितीकडे तर २ मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सकाळी १० वाजता आर्यन शाळेमध्ये मतमोजणी झाली. निकाल घोषित होऊ लागल्या नंतर भगवे झेंडे आणि कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला च्या जयघोषात पूर्ण परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता. त्यामुळे पालघर तालुका हा सेनेचा बालेकिल्ला असल्याचे आज ह्या निकालाने सिद्ध केले.उमरोळी, पंचाळी, नवापूर, मुरबे, केळवे, ह्या ग्रामपंचायतींच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या ह्या ग्रामपंचायती सेनेने आपल्याकडे खेचून आणल्या असून फक्त मुरबे ग्रामपंचायतीमध्ये ७-७ अशा समसमान जागा निवडून आल्याने सत्तेची चावी स्वाभिमान संघटनेच्या एकमेव विजयी उमेदवारांकडे असल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोशन पाटील यांनी केला असला तरी सर्वपक्षीय आघाडीने ठरविल्याने सरपंच आमचाच असेल असे सेनेचे जि प उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी सांगितले. उमरोळी येथील बहुजन विकास आघाडीच्या प्रभाकर पाटलांची सत्ता उलथून टाकीत सेनेने आपला झेंडा रोवला .तर केळवे येथील बविआ च्या सरपंचा विरोधातील संतप्त भावना मतदारांनी मतपेटीतून व्यक्त करतांना बविअच्या अनेक उमेदवाराना पराभूत केले. तेथे सेनेचे १४ उमेदवार विजयी झाले तर मनसे १ तर बहुजनला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. नवापूर येथे बहुजन आणि सेनेच्या असलेल्या सत्तेलाही सुरुंग लावून भाजपचे अशोक वडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अंकुर राऊत यांच्या नेतृत्वा खाली १३ पैकी ७ जागांवर बहुमत मिळविले. तारापूर एमआयडीसी प्रदूषणाच्या पाईपलाईन प्रकरणात काही ग्रामपंचायत सदस्याचा असलेला छुपा पाठिंबा आणि विकासकामांच्या नावावर चाललेली अनियमितता यामुळे सेनेचा पुरता धुव्वा उडवितांना मतदारांनी बहुजनलाही सत्तेपासून रोखले. खारे कुरण ग्रामपंचायतीमध्ये हि सेनेचे सभापती रवींद्र पागधरे ह्यांना धक्का देऊन मिठागरांच्या मुद्यावर बविआ ने शिटी वाजवून सत्ता प्रस्थापित केली. तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पैकी फक्त मोरेकुरण, ह्या एकमेव ग्रामपंचायती वर सेनेची सत्ता होती, तर उर्वरीत पंचाळी, उमरोळी, आलेवाडी, मुरबे, नवापूर, केळवे, मांडे, नांदगाव, कान्द्रेभुरे, दातीवरे, वेढी, कुंभवली, दापोली, मोरेकुरण, कोलवडे, दांडे खटाळी, विराथन, माकुणसार, खारेकुरण, ई. ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षाची सत्ता होती.त्यांच्या कडून सत्ता हिरावून घेण्यात आपण बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने यशस्वी झालो. अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केली आहे. उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, वैभव संखे, सुधीर तामोरे, संजय तामोरे, अनुप पाटील व युवसेनेची टीम तसेच शिवसैनिकांनी दिलेल्या साथीमुळेच तालुक्यात सेनेला हा विजय मिळवता आला. पालघर तालुक्यात सेनेचे असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यात सेनेला यश आले असेही ते म्हणाले.