शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

पालघरमधील शेतकऱ्यांचे ९२ कोटींचे कर्ज माफ

By admin | Updated: June 25, 2017 03:52 IST

दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या पालघरच्या १५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या पालघरच्या १५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झालीपालघर जिल्ह्यातील १५ हजार ५८१ शेतकऱ्यांकडे सुमारे १०३ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी होती. परंतु, जून महिन्यात काही शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्याने शिल्लक राहिलेल्या ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यापैकी १३ हजार ९६९ शेतकऱ्यांना ८० कोटी ५१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. याशिवाय एक हजार ८८२ शेतकऱ्यांना १२ कोटींचे मध्यम मुदतीची कर्जमाफी झाली. पाच हजार २५९ मोठ्या शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. तर २४ कोटी ६१ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ सुमारे तीन हजार ७५४ लहान शेतकऱ्यांना झाला आहे. सहा हजार ६५३ मध्यम शेतकऱ्यांना सुमारे ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी झाली .पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.