शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:17 IST

तिघांचा मृत्यू : १९१ पोलिसांना लागण, १५१ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोनाने वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातही थैमान घातले आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील १९१ पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून १५१ पोलीस कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. यातील बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरही हजर झाले आहेत.पालघरमधील वसई तालुक्यात दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित रु ग्ण सापडत आहेत. यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात आहे. वसई, विरार व पालघर जिल्ह्यामध्ये ८ जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी कोरोनाचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाली असून रोज कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे जादा प्रमाण हीच एकमेव या काळात समाधानाची बाब ठरली आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. कामधंदे ठप्प झाले आहेत. अर्थव्यवस्थेचे चाक चिखलात रुतले आहे. हे संकट असताना अद्याप वसई, विरार व एकूणच पालघर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस दलातील कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.

पालघर पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, ते तिघेही वालीव पोलीस ठाण्याचे कर्मचारी होते. पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा यात मृत्यू झाला. आतापर्यंत १५१ पोलीस कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३७ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपचार घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोना होत आहे, ही बाब चिंताजनक आहे.वालीव पोलीस ठाण्यात आज तपासणीवालीव पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने सर्वत्र याच पोलीस ठाण्याची चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वालीव पोलीस ठाण्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वसई-विरार महानगरपालिका आरोग्य विभागातील डॉक्टरांचे एक पथक शुक्रवारी सकाळपासून पोलीस ठाण्यातील कार्यरत १२५ ते १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची रॅपिड तपासणी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.