शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:17 IST

तिघांचा मृत्यू : १९१ पोलिसांना लागण, १५१ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोनाने वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातही थैमान घातले आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील १९१ पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून १५१ पोलीस कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. यातील बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरही हजर झाले आहेत.पालघरमधील वसई तालुक्यात दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित रु ग्ण सापडत आहेत. यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात आहे. वसई, विरार व पालघर जिल्ह्यामध्ये ८ जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी कोरोनाचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाली असून रोज कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे जादा प्रमाण हीच एकमेव या काळात समाधानाची बाब ठरली आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. कामधंदे ठप्प झाले आहेत. अर्थव्यवस्थेचे चाक चिखलात रुतले आहे. हे संकट असताना अद्याप वसई, विरार व एकूणच पालघर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस दलातील कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.

पालघर पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, ते तिघेही वालीव पोलीस ठाण्याचे कर्मचारी होते. पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा यात मृत्यू झाला. आतापर्यंत १५१ पोलीस कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३७ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपचार घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोना होत आहे, ही बाब चिंताजनक आहे.वालीव पोलीस ठाण्यात आज तपासणीवालीव पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने सर्वत्र याच पोलीस ठाण्याची चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वालीव पोलीस ठाण्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वसई-विरार महानगरपालिका आरोग्य विभागातील डॉक्टरांचे एक पथक शुक्रवारी सकाळपासून पोलीस ठाण्यातील कार्यरत १२५ ते १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची रॅपिड तपासणी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.