शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:51 IST

ग्रामीण परिसरातील कोरोनाचिंतेचे वातावरण झाले कमी

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा (९६.८६ टक्के) राज्यात सर्व जिल्ह्यांमधून अव्वल स्थानी राहिला आहे. आरोग्य विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील आजारी रुग्णांचा घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. पालघरमधील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यातील ३५ जिल्ह्यांतून अधिक असल्याचे आढळून आले आहे.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४ हजार ९१८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४ हजार ४६८ रुग्ण बरे झाले आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५२  कोरोनाबाधित असून, त्यापैकी डहाणू तालुका २०, जव्हार ६, मोखाडा १, पालघर १०५, तलासरी ६, वसई ग्रामीण १, विक्रमगड २, वाडा ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित नागरिकांपैकी १०९ नागरिकांनी घरी विलगीकरण करून घेतले गेले. उर्वरित इतर रुग्ण विक्रमगडमधील रिव्हेरा आणि बोईसरमधील टिमा समर्पित कोरोना केंद्रांमध्ये व इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात २९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्युदर (सीएफआरनुसार) २.० टक्के आहे. मृत्युदरांमध्ये वसई ग्रामीण भागातील मृत्युदर ३.६ टक्के असून, वाडा, पालघर, डहाणू, मोखाडा येथील मृत्युदर सरासरीच्या जवळपास आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जव्हार, विक्रमगड, तलासरी आणि वाडा या तालुक्यांमधील कामगिरी समाधानकारक आहे. जिल्ह्यात ४३,५५० नागरिक बाधित संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह ४३ हजार ५५० नागरिकांना कोरोनाबाधा झालेली असून, त्यापैकी १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या आजारावर ४१ हजार ७०६ रुग्णांनी मात केली आहे.  सध्या ६७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेने केलेल्या कामाचे हे फलित असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या