शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:51 IST

ग्रामीण परिसरातील कोरोनाचिंतेचे वातावरण झाले कमी

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा (९६.८६ टक्के) राज्यात सर्व जिल्ह्यांमधून अव्वल स्थानी राहिला आहे. आरोग्य विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील आजारी रुग्णांचा घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. पालघरमधील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यातील ३५ जिल्ह्यांतून अधिक असल्याचे आढळून आले आहे.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४ हजार ९१८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४ हजार ४६८ रुग्ण बरे झाले आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५२  कोरोनाबाधित असून, त्यापैकी डहाणू तालुका २०, जव्हार ६, मोखाडा १, पालघर १०५, तलासरी ६, वसई ग्रामीण १, विक्रमगड २, वाडा ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित नागरिकांपैकी १०९ नागरिकांनी घरी विलगीकरण करून घेतले गेले. उर्वरित इतर रुग्ण विक्रमगडमधील रिव्हेरा आणि बोईसरमधील टिमा समर्पित कोरोना केंद्रांमध्ये व इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात २९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्युदर (सीएफआरनुसार) २.० टक्के आहे. मृत्युदरांमध्ये वसई ग्रामीण भागातील मृत्युदर ३.६ टक्के असून, वाडा, पालघर, डहाणू, मोखाडा येथील मृत्युदर सरासरीच्या जवळपास आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जव्हार, विक्रमगड, तलासरी आणि वाडा या तालुक्यांमधील कामगिरी समाधानकारक आहे. जिल्ह्यात ४३,५५० नागरिक बाधित संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह ४३ हजार ५५० नागरिकांना कोरोनाबाधा झालेली असून, त्यापैकी १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या आजारावर ४१ हजार ७०६ रुग्णांनी मात केली आहे.  सध्या ६७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेने केलेल्या कामाचे हे फलित असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या