शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकाची नुकसानभरपाई मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:05 IST

दोन वर्षे उलटली : शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा इशारा

मुरबाड : हातात आलेले भाताचे पीक खोडकिड्याने नष्ट केले. फक्त सडलेला पेंढा उरला आहे. केलेले कष्ट वाया गेल्याने भगवान भला व इतर शेतकऱ्यांनी पिकाची अवस्था पाहून पेंढ्याला काडी लावली. या घटनेला दोन वर्षे झाली, तरी भातपिकाची नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकºयांनी तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

२०१७ मध्ये मुरबाड तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले. सरकारने नुकसानभरपाईची रक्कम मंजूर केली, परंतु ती रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात टाळाटाळ सुरू आहे, अशी तक्रार मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व शिरोशी विभाग सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक पठारे यांनी केली आहे.

नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेले, तर त्यांना मुरबाड तालुका कृषी कार्यालयाने माहिती दिली नाही, असे सांगतात. कृषी कार्यालयात चौकशी केली असता मुरबाड पंचायत समितीकडून काहीही माहिती आली नाही, असे उत्तर देतात. पंचायत समिती कार्यालयात आमच्याकडून कोणतेही काम बाकी नाही. विभागाने सर्व काम पूर्ण केले आहे, असे अधिकारी सांगतात. मग, सरकारने मंजूर केलेली रक्कम शेतकºयांना का मिळत नाही, असा सवाल भला व पठारे यांनी विचारला आहे.

चार हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ६३ लाख जमा करण्यासाठी कृषी विभागाने बँकेकडे याद्या पाठवल्या होत्या. परंतु, बँकेने याद्या संगणकावर एक्सेलशीटवर तयार करून पाठवा, असे सांगून परत पाठवल्या आहेत. त्याचे काम सुरू असून लवकरच रक्कम बँकेत जमा होईल. संयुक्त मालकी असलेल्या जमीनधारकांनी संमतीपत्र देणे आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी दोन ते तीन दिवसांत कृषी विभाग, ग्रामसेवक व तलाठी यांची सभा बोलावणार आहे . - अमोल कदम, तहसीलदार