शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भातपिकाची नुकसानभरपाई मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:05 IST

दोन वर्षे उलटली : शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा इशारा

मुरबाड : हातात आलेले भाताचे पीक खोडकिड्याने नष्ट केले. फक्त सडलेला पेंढा उरला आहे. केलेले कष्ट वाया गेल्याने भगवान भला व इतर शेतकऱ्यांनी पिकाची अवस्था पाहून पेंढ्याला काडी लावली. या घटनेला दोन वर्षे झाली, तरी भातपिकाची नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकºयांनी तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

२०१७ मध्ये मुरबाड तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले. सरकारने नुकसानभरपाईची रक्कम मंजूर केली, परंतु ती रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात टाळाटाळ सुरू आहे, अशी तक्रार मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व शिरोशी विभाग सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक पठारे यांनी केली आहे.

नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेले, तर त्यांना मुरबाड तालुका कृषी कार्यालयाने माहिती दिली नाही, असे सांगतात. कृषी कार्यालयात चौकशी केली असता मुरबाड पंचायत समितीकडून काहीही माहिती आली नाही, असे उत्तर देतात. पंचायत समिती कार्यालयात आमच्याकडून कोणतेही काम बाकी नाही. विभागाने सर्व काम पूर्ण केले आहे, असे अधिकारी सांगतात. मग, सरकारने मंजूर केलेली रक्कम शेतकºयांना का मिळत नाही, असा सवाल भला व पठारे यांनी विचारला आहे.

चार हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ६३ लाख जमा करण्यासाठी कृषी विभागाने बँकेकडे याद्या पाठवल्या होत्या. परंतु, बँकेने याद्या संगणकावर एक्सेलशीटवर तयार करून पाठवा, असे सांगून परत पाठवल्या आहेत. त्याचे काम सुरू असून लवकरच रक्कम बँकेत जमा होईल. संयुक्त मालकी असलेल्या जमीनधारकांनी संमतीपत्र देणे आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी दोन ते तीन दिवसांत कृषी विभाग, ग्रामसेवक व तलाठी यांची सभा बोलावणार आहे . - अमोल कदम, तहसीलदार