शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भातपिकाची नुकसानभरपाई मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:05 IST

दोन वर्षे उलटली : शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा इशारा

मुरबाड : हातात आलेले भाताचे पीक खोडकिड्याने नष्ट केले. फक्त सडलेला पेंढा उरला आहे. केलेले कष्ट वाया गेल्याने भगवान भला व इतर शेतकऱ्यांनी पिकाची अवस्था पाहून पेंढ्याला काडी लावली. या घटनेला दोन वर्षे झाली, तरी भातपिकाची नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकºयांनी तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

२०१७ मध्ये मुरबाड तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले. सरकारने नुकसानभरपाईची रक्कम मंजूर केली, परंतु ती रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात टाळाटाळ सुरू आहे, अशी तक्रार मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व शिरोशी विभाग सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक पठारे यांनी केली आहे.

नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेले, तर त्यांना मुरबाड तालुका कृषी कार्यालयाने माहिती दिली नाही, असे सांगतात. कृषी कार्यालयात चौकशी केली असता मुरबाड पंचायत समितीकडून काहीही माहिती आली नाही, असे उत्तर देतात. पंचायत समिती कार्यालयात आमच्याकडून कोणतेही काम बाकी नाही. विभागाने सर्व काम पूर्ण केले आहे, असे अधिकारी सांगतात. मग, सरकारने मंजूर केलेली रक्कम शेतकºयांना का मिळत नाही, असा सवाल भला व पठारे यांनी विचारला आहे.

चार हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ६३ लाख जमा करण्यासाठी कृषी विभागाने बँकेकडे याद्या पाठवल्या होत्या. परंतु, बँकेने याद्या संगणकावर एक्सेलशीटवर तयार करून पाठवा, असे सांगून परत पाठवल्या आहेत. त्याचे काम सुरू असून लवकरच रक्कम बँकेत जमा होईल. संयुक्त मालकी असलेल्या जमीनधारकांनी संमतीपत्र देणे आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी दोन ते तीन दिवसांत कृषी विभाग, ग्रामसेवक व तलाठी यांची सभा बोलावणार आहे . - अमोल कदम, तहसीलदार