शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्ह्यात भातलागवड सुरू; पावसाचा मात्र लपंडाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६५ हजार हेक्टरवर ‘भाताची पेरणी केली. आता त्याचे रोपही चांगले वाढल्याने शेतकऱ्यांनी खाचरात साचलेल्या पाण्यात आता भातलागवडीला सुरुवात केली; पण गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा जिल्ह्यात लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे विचारण्याची वेळ आली आहे. यामुळे मुरबाडसह कल्याण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकर्यांनी पीके जगविण्यासाठी बाहेरून पाणी आणून ते शिंपडून धडपड चालविली आहे

तरी दबार पेरणीचे संकट कायम आहजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या भात उत्पादनासाठी महाबीज आणि उत्पादकांमार्फत ११ हजार २८६ क्विंटल बियाण्यांचा वापर केला आहे. या बियाण्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा ११६ अधिकृत विक्रेते जिल्ह्यात आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा १८ गुण नियंत्रण निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे. शिवाय एकूण सहा भरारी पथके नेमून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे येथील कार्यालयात कृषी निविष्ठा सैनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी सोडवल्या जात आहेत.

कोरोनाचा काळ आणि त्यात संचार बंदी असताना यंदाही प्रतिबंधात्मक नियम पाळून बी-बियाणे उपलब्ध केले आहेत. महाबीज आणि खासगी उत्पादकांमार्फत तब्बल चार हजार ५६० क्विंटल बियाणांचा आधीच कृषी सेवा केंद्रांवर पुरवठा केला होता. दर्जेदार बियाणे अगदी वेळेवर मिळाल्यामुळे भातरोपांची वाढही उत्तम झाली. काही शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या खाचरात चिखलणी करून सध्या भातलागवडीच्या कामाला सुरुवात केली. भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भातलागवडीला अगदी वेळेवर सुरुवात केली आहे. मात्र, पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पिकांनी ऊन धरायला सुरुवात केली आहे.

-----------------------