शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भातलागवड सुरू; पावसाचा मात्र लपंडाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६५ हजार हेक्टरवर ‘भाताची पेरणी केली. आता त्याचे रोपही चांगले वाढल्याने शेतकऱ्यांनी खाचरात साचलेल्या पाण्यात आता भातलागवडीला सुरुवात केली; पण गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा जिल्ह्यात लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे विचारण्याची वेळ आली आहे. यामुळे मुरबाडसह कल्याण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकर्यांनी पीके जगविण्यासाठी बाहेरून पाणी आणून ते शिंपडून धडपड चालविली आहे

तरी दबार पेरणीचे संकट कायम आहजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या भात उत्पादनासाठी महाबीज आणि उत्पादकांमार्फत ११ हजार २८६ क्विंटल बियाण्यांचा वापर केला आहे. या बियाण्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा ११६ अधिकृत विक्रेते जिल्ह्यात आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा १८ गुण नियंत्रण निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे. शिवाय एकूण सहा भरारी पथके नेमून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे येथील कार्यालयात कृषी निविष्ठा सैनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी सोडवल्या जात आहेत.

कोरोनाचा काळ आणि त्यात संचार बंदी असताना यंदाही प्रतिबंधात्मक नियम पाळून बी-बियाणे उपलब्ध केले आहेत. महाबीज आणि खासगी उत्पादकांमार्फत तब्बल चार हजार ५६० क्विंटल बियाणांचा आधीच कृषी सेवा केंद्रांवर पुरवठा केला होता. दर्जेदार बियाणे अगदी वेळेवर मिळाल्यामुळे भातरोपांची वाढही उत्तम झाली. काही शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या खाचरात चिखलणी करून सध्या भातलागवडीच्या कामाला सुरुवात केली. भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भातलागवडीला अगदी वेळेवर सुरुवात केली आहे. मात्र, पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पिकांनी ऊन धरायला सुरुवात केली आहे.

-----------------------