शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:21 IST

समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

ठाणे : समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाण्यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेचा मुद्दा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मांडला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला. वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या इमारती अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत. त्यांचा पुनर्विकास करून पोलिसांना मालकी हक्काने कायमस्वरूपी घरे कशी देता येतील, यादृष्टीने योजना आखण्याच्या सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना केल्या.ठाण्याचे पालकमंत्री, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी यासाठी पुढाकार घेऊन सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांचाही या योजनेमध्ये समावेश करावा. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ घेता येईल. ठाण्याच्या धर्तीवर ही योजना राज्यभरात राबविता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.वर्तकनगर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख करून, ही समस्या सोडविण्याची त्यांनी ग्वाही दिली.कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभारण्यात आले. त्यासाठी विकासकाला कन्स्ट्रक्शनस् टीडीआर (बांधकाम खर्चाच्या मोबदल्यात दुसरा भूखंड देणे) देण्यात आला. हा प्रयोग अतिशय चांगला आहे. अनेक शहरांमध्ये पोलीस ठाण्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळे अशा प्रकारची कल्पक योजना राबवून राज्यभरातील पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती बांधता येतील. संबंधित विभागांना यासंदर्भात सूचना केल्या जातील, असे सूतोवाच त्यांनी केले.प्रशासकीय कामासाठी ठाण्यात येणाºया मुंबई आणि इतर ठिकाणच्या पोलीस अधिकाºयांसाठी राहण्याची सोय नसते. पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींमुळे आता ती गैरसोय दूर होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.आॅनलाईन पोलीस ठाण्याच्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्तुती केली. पुण्यात ई-कम्प्लेन्टची सुविधा असल्याने नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याची गरजच राहत नाही. ही योजना राज्यभर राबविण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना केली.ठाणे शहर सर्वांगाने उत्तम बनविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यानंतर पवारनगर मनपा शाळेच्या मध्यान्ह भोजन योजनेचे उद्घाटन त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस