शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

ओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 20:27 IST

आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही.

ठळक मुद्देआंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाहीसंरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजचपण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही

ठाणे : दलित व मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी एमआयएमचे असरूद्दीन ओवेसी आणि भारीपचे प्रकाश आंबेडकर एकत्र आले. पण दलित आणि मुस्लिम त्यांच्या दोघांबरोबरही नाही. यामुळे त्यांचा काहीही फायदा होणार नाही. देशाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसणार नसल्याचे केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे येथे स्पष्ट केले.आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही. दलित व मुस्लिम दोन्ही माझ्या बरोबर आहे. यामुळे एकत्र येऊनही या दोघांचा फायदा होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले.देशाच्या संरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजच होती. त्याच्या खरेदीसाठी एखाद्या कंपनीची मध्यस्थिती आवश्यकच होती. अनिल अंबानीच्या कंपनीने ती मध्यस्थि केली. त्यात त्यांचाफायदा झाला. तो त्यांना मिळावा असा काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू नव्हता. राफेल खरेदीची बदनामी करण्यासाठी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यापासून खासदार राहूल गांधी परत परत तोच तोच मुद्दा काढून टिका करीत आहे. पण ही टिका मोंदींना पचवण्यार असून राहूल गांधींना त्याचा काही फायदा होणार नाही. या लढावू विमानांचा फायदा आता पाकिस्थानशी युध्द करण्यासाठी होणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांना १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रयत्न करीत आहेत. पण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही. घटनेनुसार ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. यामुळे आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही. मराठ्याना आरक्षण देण्यासाठी प्रथम लोकसभेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करायला पाहिजे. तरच आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल. मराठ्यांन प्रमाणेचेगुजरात, हरिणात आदी ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. त्यांनाही या कायद्यामुळे आरक्षण मिळवून देता येणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदर उदयन राजे यांच्या भेटीसही खासदार राजू शेट्टी यांची कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी, पेट्रोल- डिझेल भाव वाढ कमी करण्यासाठी केंद्र व राज्यांनी कर कमी करणे, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील हिंदुराष्ट्र विषयीचा चांगला बदल, राम मंदीर आदी विषय आठवले यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेthaneठाणे