शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 20:27 IST

आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही.

ठळक मुद्देआंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाहीसंरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजचपण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही

ठाणे : दलित व मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी एमआयएमचे असरूद्दीन ओवेसी आणि भारीपचे प्रकाश आंबेडकर एकत्र आले. पण दलित आणि मुस्लिम त्यांच्या दोघांबरोबरही नाही. यामुळे त्यांचा काहीही फायदा होणार नाही. देशाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसणार नसल्याचे केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे येथे स्पष्ट केले.आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही. दलित व मुस्लिम दोन्ही माझ्या बरोबर आहे. यामुळे एकत्र येऊनही या दोघांचा फायदा होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले.देशाच्या संरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजच होती. त्याच्या खरेदीसाठी एखाद्या कंपनीची मध्यस्थिती आवश्यकच होती. अनिल अंबानीच्या कंपनीने ती मध्यस्थि केली. त्यात त्यांचाफायदा झाला. तो त्यांना मिळावा असा काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू नव्हता. राफेल खरेदीची बदनामी करण्यासाठी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यापासून खासदार राहूल गांधी परत परत तोच तोच मुद्दा काढून टिका करीत आहे. पण ही टिका मोंदींना पचवण्यार असून राहूल गांधींना त्याचा काही फायदा होणार नाही. या लढावू विमानांचा फायदा आता पाकिस्थानशी युध्द करण्यासाठी होणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांना १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रयत्न करीत आहेत. पण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही. घटनेनुसार ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. यामुळे आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही. मराठ्याना आरक्षण देण्यासाठी प्रथम लोकसभेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करायला पाहिजे. तरच आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल. मराठ्यांन प्रमाणेचेगुजरात, हरिणात आदी ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. त्यांनाही या कायद्यामुळे आरक्षण मिळवून देता येणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदर उदयन राजे यांच्या भेटीसही खासदार राजू शेट्टी यांची कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी, पेट्रोल- डिझेल भाव वाढ कमी करण्यासाठी केंद्र व राज्यांनी कर कमी करणे, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील हिंदुराष्ट्र विषयीचा चांगला बदल, राम मंदीर आदी विषय आठवले यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेthaneठाणे