शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

२९९२७ बाधितांची घरीच उपचार घेऊन बेडच्या तुटवड्यावर मात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. रुग्णालयातील बेड कमी पडत असल्याने गंभीर समस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. रुग्णालयातील बेड कमी पडत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. या समस्येवर मात करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ९२७ बाधितांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता घरात राहून डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरु केले आहेत. यात ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक नऊ हजार ६९४ बाधितांचा समावेश आहे. त्यांच्या या सामंजस्याने गंभीर रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होऊन ते बरे झाले. या गंभीर परिस्थितीतही जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७१ टक्के असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी समजदारी घेऊन, कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने २९ हजार ९२७ बाधितांना घरातच ठेवून उपचार करून घेतले. यामुळे रुग्णालयांमधील बेडच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. याशिवाय महामारीच्या अफवांना बळी न पडता जिल्ह्यातील तब्बल ३९ लाख २१ हजार ९५७ जणांनी घरात राहून विलगीकरणाचा १४ दिवसांचा काळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याशिवाय पाच लाख ४५ हजार ३८८ जणांनी स्वत:हून घरातच क्वारंटाईन होत कोरोनावर मात केली. कोणत्याही अफवांचा जास्त विचार न करता उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी या बाधितांनी डॉक्टरांच्या निगराणीत घरात राहून कोरोनामुक्तीचा संदेश दिला.

रुग्णालयांमध्ये बेड नसल्याचे लक्षात येताच त्याचा बागुलबुवा न करता या २९ हजार ९२७ जणांनी घरातच उपचार सुरु करुन कोरोनाला हद्दपार केले. यात ठाणेे महानगरचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आहे. तब्बल नऊ हजार ६९४ ठाणेकरांनी घरातच उपचार करीत कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याखालोखाल कल्याण डोंबिवलीतील आठ हजार ३९८ आणि तृतीय क्रमांकावरील नवी मुंबईत चार हजार ८०५ नवी मुंबईकरांनी घरीच उपचार घेतला.

_-----

पुरक जोड आहे