शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

जिल्ह्यात सात लाखांवर वाहने; प्रदूषण चाचणीत अडीच हजार वाहनांनाच दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 23:44 IST

आठ महिन्यांत २२,८२३ वाहनांची तपासणी : १० लाख ५३ हजारांचा दंड वसूल

जितेंद्र कालेकरठाणे : गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यात ५,२३,०४१ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. प्रत्यक्षात वाहनांची संख्या ही सात लाखांहून अधिक आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबईत २२,८२३ वाहनांची प्रदूषण चाचणी झाली. यातील दोषी २,३३४ चालकांकडून १०,५३,८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नवीन वाहन सुरुवातीला काही वर्षे सुरळीत चालते. परंतु, कालांतराने त्याची प्रदूषण चाचणी करणे गरजेचे आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत जिल्हाभर २६१ पीयूसी केंद्रे आहेत. कारसाठी १०० तर दुचाकीसाठी ५० रुपयांतही चाचणी होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ठाण्यात १८,९२०, कल्याणमध्ये २,६९२ तर, नवी मुंबईत १,२११ वाहने आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासली. यामध्ये २,३३४ वाहने दोषी आढळली. ठाण्यातील १,२९७ दोषी चालकांकडून ६,७७,९०० रुपये, कल्याणमध्ये ५६६ जणांकडून १,१९,२०० रुपये तर नवी मुंबईमध्ये ४७१ जणांकडून २,५६,००० दंड वसूल केला आहे.

पीयूसी न करणाऱ्यांना एक हजाराचा दंडप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू पथकाने किंवा वाहतूक पोलिसांनी जर एखादे वाहन पकडले अन् त्यात ते दोषी आढळले तर संबंधितांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. अनेकदा वाहन पकडल्यानंतर पीयूसी नसेल तर वाहनचालकांना ते सादर करण्याची सात दिवसांची मुदत दिली जाते. तरीही ते सादर केले नाही, तर ही दंडात्मक कारवाई होते, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. 

वाहनाची प्रदूषण चाचणी करणे आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा वाहनांतून जास्त धूर निघत असेल तर वायुप्रदूषणात वाढ होते. त्यामुळे श्वसन, फुप्फुसाशी निगडित विकारांचा संभव असतो. परिणामी, प्रत्येक वाहनाचे प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी शासनाने पीयूसी बंधनकारक केले आहे. ते नसल्यास कलम ११५ तसेच १९० अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाई होते.- विश्वंभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.