शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत एप्रिलमध्ये नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत एप्रिलमध्ये नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी या आजारातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सोमवारपर्यंतचा आढावा घेता मागील २६ दिवसांत ३२ हजार ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५५ टक्के आहे. महत्त्वाचे वर्षभरात आतापर्यंत १ लाख १ हजार ३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेले वर्षभरातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेता सोमवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत १ लाख १७ हजार २३० रुग्ण आढळले आहेत. १ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १ लाख १ हजार ३५० इतके रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. मार्चपासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला सुरुवात झालेल्या केडीएमसीच्या हद्दीत सध्या दररोज आढळणारी रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या आसपास आहे. मार्चमध्ये १४ हजार ५८९ रुग्ण आढळून आले होते. ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर आठ हजार ९८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान एप्रिलमध्ये कोरोनाने कहर केला असून ११ एप्रिलला तर दोन हजार ४०५ रुग्ण आढळले होते. ही आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. सोमवापर्यंतच्या मागील २६ दिवसांत ३८ हजार ५७ रुग्ण सापडले आहेत. तर १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी असली तरी कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची दैनंदिन संख्याही सध्या एक ते दीड हजारांच्या आसपास पोहोचली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५५ टक्के

सोमवारी मात्र ८५४ नव्या रुग्णांची भर पडली तर बरे झालेल्यांची संख्या एक हजार ४४५ होती. १२ एप्रिलपासून ही संख्या हजारांहून अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८५ टक्के इतके होते ते आता ८५.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

----------------------------------