शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मोखाड्यामध्ये नागली, भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:27 IST

शेतकरी धास्तावले : हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती, मुसळधार पावसाचा परिणाम

जव्हार : मोखाडा तालुक्यात खरिपात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सततच्या मुसळधार पावसामुळे भातावर बगळ्या तर नागली पिकावर बेडक्या आणि खैºया रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातच हे पीक आडवे होऊ न ते कुजू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असून धान्याऐवजी हाती पेंढाच येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोखाड्यात खरिपाच्या एकूण १३ हजार हेक्टर शेतीच्या चार हजार ५०० हेक्टर नागली, तर भाताचे दोन हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकमेव खरीप पिकाचाच उदरनिर्वाहासाठी आधार आहे. अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पोटरीत आलेल्या ( लोंब येण्याची वेळ ) पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.मुख्य नगदी पीक असलेल्या नागलीवर बेडक्या आणि खैºया तर भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन जमीनदोस्त होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापुढे सतत कोसळधार सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकºयांच्या हाती गवताचा पेंढा येणार आहे.नागली व भाताचे पीक चांगले बहरले होते. मात्र, सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या पिकांवर बगळ्या, बेडक्या आणि खैºया हा रोग पडला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी ही पिकांची पाहणी केली आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी.- दिलीप जागळे,शेतकरी व माजी सरपंच, गोमघर-डोंगरवाडी 

टॅग्स :thaneठाणे