शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मोखाड्यामध्ये नागली, भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:27 IST

शेतकरी धास्तावले : हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती, मुसळधार पावसाचा परिणाम

जव्हार : मोखाडा तालुक्यात खरिपात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सततच्या मुसळधार पावसामुळे भातावर बगळ्या तर नागली पिकावर बेडक्या आणि खैºया रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातच हे पीक आडवे होऊ न ते कुजू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असून धान्याऐवजी हाती पेंढाच येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोखाड्यात खरिपाच्या एकूण १३ हजार हेक्टर शेतीच्या चार हजार ५०० हेक्टर नागली, तर भाताचे दोन हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकमेव खरीप पिकाचाच उदरनिर्वाहासाठी आधार आहे. अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पोटरीत आलेल्या ( लोंब येण्याची वेळ ) पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.मुख्य नगदी पीक असलेल्या नागलीवर बेडक्या आणि खैºया तर भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन जमीनदोस्त होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापुढे सतत कोसळधार सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकºयांच्या हाती गवताचा पेंढा येणार आहे.नागली व भाताचे पीक चांगले बहरले होते. मात्र, सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या पिकांवर बगळ्या, बेडक्या आणि खैºया हा रोग पडला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी ही पिकांची पाहणी केली आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी.- दिलीप जागळे,शेतकरी व माजी सरपंच, गोमघर-डोंगरवाडी 

टॅग्स :thaneठाणे