शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

कल्याण : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केडीएमसी आणि ...

कल्याण : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केडीएमसी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पाणीप्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी केली. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर एका दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

डोंबिवली पूर्वेतील काही परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर, सागाव परिसराला पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथे कधी पाणी येते, तर कधी येत नाही. अनेकदा पाण्याचा दाबही कमी असतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तासन्‌तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात घेतली. यावेळी उपस्थित असलेले नागरिक संतप्त झाले. पाणी कमी दाबाने का येते? औद्योगिक भागातील कंपन्यांना पाणी मिळते, मग नागरिकांना का मिळत नाही, असे प्रश्न त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

याबाबत पाटील म्हणाले, ‘‘सात दिवसांत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एक लाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यानंतर पाणीप्रश्न सुटेल, अशी आशा आहे; मात्र पाणीप्रश्न सुटला नाही तर नागरिकांचा उद्रेक होईल.

ब्रेकडाऊनमुळे समस्या

याबाबत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर यांनी सांगितले की, केडीएमसीचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता संयुक्त पाहणी करतील. दुर्दैवाने दोन तीन वेळा ब्रेकडाऊन झाल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला. लवकर ही समस्या सुटेल.

-------