शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिल्ह्यातील ६५० हेक्टर भात पिकावर बगळ्यासह कीड रोगाचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या प्रमुख पिकाची सर्वाधिक लागवड जिल्ह्यात वेळेवर झाली. मात्र, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे भात पिकावर बगळ्या रोगाचा आणि कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हाभरात ६०० ते ६५० हेक्टर क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

भात पिकावर बगळ्या रोगासह काही ठिकाणी खोड किड्याचा व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पानं गुंडाळणारी अळी पानाच्या कडा गुंडाळून आतील रस शोषून घेते. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात. सुरळीतील अळी पानाच्या टोकाची सुरळी करून रस शोषून घेते. त्यामुळे पाने पांढरी पडत असल्याने या रोगाला शेतकरी बगळ्या रोग म्हणून ओळखतात. या प्रादुर्भावामुळे भात पिकाची वाढ खुंटते. खोड किड्याची अळी भाताच्या खोडात लपून तिथे गाभा पोखरून खाते. यामुळे खोडातून अन्न वर जाऊ शकत नाही. परिणामी, पाने सुकून, सुरळी होऊन लाल पिवळसर पडत आहेत. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर देखरेख सुरू केली आहे.

जिल्हाभरात एकूण लागवडीच्या एक टक्का क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्तास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दुजोरा दिला आहे. कीड नियंत्रित करणारी औषधी ५० टक्के अनुदानाने उपलब्ध करून दिली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना कृषी साहाय्यकांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे माने यांनी सांगितले. या रोगावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले.