शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जिल्ह्यातील ६५० हेक्टर भात पिकावर बगळ्यासह कीड रोगाचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड करण्यात आली आहे. यातील भात या प्रमुख पिकाची सर्वाधिक लागवड जिल्ह्यात वेळेवर झाली. मात्र, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे भात पिकावर बगळ्या रोगाचा आणि कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हाभरात ६०० ते ६५० हेक्टर क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

भात पिकावर बगळ्या रोगासह काही ठिकाणी खोड किड्याचा व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पानं गुंडाळणारी अळी पानाच्या कडा गुंडाळून आतील रस शोषून घेते. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात. सुरळीतील अळी पानाच्या टोकाची सुरळी करून रस शोषून घेते. त्यामुळे पाने पांढरी पडत असल्याने या रोगाला शेतकरी बगळ्या रोग म्हणून ओळखतात. या प्रादुर्भावामुळे भात पिकाची वाढ खुंटते. खोड किड्याची अळी भाताच्या खोडात लपून तिथे गाभा पोखरून खाते. यामुळे खोडातून अन्न वर जाऊ शकत नाही. परिणामी, पाने सुकून, सुरळी होऊन लाल पिवळसर पडत आहेत. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर देखरेख सुरू केली आहे.

जिल्हाभरात एकूण लागवडीच्या एक टक्का क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्तास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दुजोरा दिला आहे. कीड नियंत्रित करणारी औषधी ५० टक्के अनुदानाने उपलब्ध करून दिली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना कृषी साहाय्यकांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे माने यांनी सांगितले. या रोगावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले.