शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

६० हजारांपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी अनेक रिक्षाचालकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे हे काम करण्याचे मोठे आव्हान कल्याण आरटीओसमोर असून, आतापर्यंत ६० हजारांपैकी १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्यासंदर्भातील नोंदी कशा करायच्या, हा मोठा प्रश्न आरटीओसमोर आहे.

उपप्रादेशिक अधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. आधारकार्ड लिंक करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे उघडली आहेत. शुक्रवारपासून हे काम करण्यात येणार होते. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते. त्यापाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. सुरुवातीला रिक्षाचालकांना इंटरनेटची आवश्यक लिंक मिळत नव्हती. मिळाली तर सतत हँग होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे रिक्षा संघटनांनी नाराजी दर्शवली होती. कल्याण उपप्रादेशिक परिवहनची बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे. त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे; पण त्यात परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन्स, बॅच आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून, प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असेही अधिकारी म्हणाले.