शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

"देशासाठी त्याग करूनही आमच्या नशिबी वेदना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:51 IST

तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्ली दरबारी मांडल्या व्यथा : राहती घरे सोडल्याची खंत

बोईसर: देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता अणुऊर्जेची गरज आहे, या भावनेने तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीकरिता सोन्यासारख्या शेत जमिनी, राहती घरे दिली तर मच्छीमारांनी उपजीविकेचा साधन असलेला समुद्र व किनाऱ्यावरही पाणी सोडले, मात्र आमच्या नशिबी १५ ते २० वर्षानंतरही वेदनाच असल्याच्या व्यथा तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्ली दरबारी मांडल्या.केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने, राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार व तारापूर प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयीन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या दालनात विविध प्रश्नांसबंधी बैठक झाली. यावेळी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा केली. या बैठकीदरम्यान सिंग यांनी या प्रश्नांबाबत निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांबरोबर तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.या बैठकीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी बोईसर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी वाढवण बंदर मच्छीमार बचाव समितीचे अध्यक्ष विजय तामोरे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडित कृती समिती, पोफरणचे माजी अध्यक्ष सुधीर तामोरे, उच्छळी मच्छीमार संस्थेचे चेअरमन नरेश तामोरे, वाढवण बंदर मच्छीमार बचाव समितीचे चिटणीस राजेंद्र तामोरे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मच्छिमार व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व प्रलंबित प्रश्न मांडले. पुनर्वसनात १२५० कुटुंबांसाठी निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचा खर्च देणे, पुनर्वसनातुन वंचित राहिलेल्या किमान ३५० कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, मच्छीमार व भूमिहीन कुटुंबाला त्यांच्या उपजीविकेसाठी प्रति कुटुंब एक हेक्‍टर शेतजमीन देण्यात यावी, सन २००७ ला लागू झालेले केंद्र सरकारचे पुनर्वसन धोरण अमलात आणावे, प्रकल्प पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी द्यावी, प्रकल्पाच्या शाळेत प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या साठी किमान २५ टक्के एवढा कोटा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात यावा, अणुऊर्जा प्रकल्पाचा सीएसआर फंड हा प्राधान्याने या परिसरातील भागात वापरण्यात यावा तसेच पोफरण व अक्करपट्टी गावांसाठी जास्त प्रमाणात निधीचा वापर व्हावा त्यात प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पांच्या नजीकच्या गावातील खाडीवरील ब्रिज तात्काळ तयार करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ३५० कुटुंबांचे पुनर्वसन करा पुनर्वसनात १२५० कुटुंबांसाठी बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचा खर्च देणे, पुनर्वसनातून वंचित राहिलेल्या किमान ३५० कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, मच्छीमार व भूमिहीन कुटुंबाला त्यांच्या उपजीविकेसाठी प्रतिकुटुंब एक हेक्‍टर शेतजमीन देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.