शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

"देशासाठी त्याग करूनही आमच्या नशिबी वेदना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:51 IST

तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्ली दरबारी मांडल्या व्यथा : राहती घरे सोडल्याची खंत

बोईसर: देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता अणुऊर्जेची गरज आहे, या भावनेने तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीकरिता सोन्यासारख्या शेत जमिनी, राहती घरे दिली तर मच्छीमारांनी उपजीविकेचा साधन असलेला समुद्र व किनाऱ्यावरही पाणी सोडले, मात्र आमच्या नशिबी १५ ते २० वर्षानंतरही वेदनाच असल्याच्या व्यथा तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्ली दरबारी मांडल्या.केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने, राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार व तारापूर प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयीन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या दालनात विविध प्रश्नांसबंधी बैठक झाली. यावेळी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा केली. या बैठकीदरम्यान सिंग यांनी या प्रश्नांबाबत निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांबरोबर तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.या बैठकीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी बोईसर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी वाढवण बंदर मच्छीमार बचाव समितीचे अध्यक्ष विजय तामोरे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडित कृती समिती, पोफरणचे माजी अध्यक्ष सुधीर तामोरे, उच्छळी मच्छीमार संस्थेचे चेअरमन नरेश तामोरे, वाढवण बंदर मच्छीमार बचाव समितीचे चिटणीस राजेंद्र तामोरे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मच्छिमार व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व प्रलंबित प्रश्न मांडले. पुनर्वसनात १२५० कुटुंबांसाठी निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचा खर्च देणे, पुनर्वसनातुन वंचित राहिलेल्या किमान ३५० कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, मच्छीमार व भूमिहीन कुटुंबाला त्यांच्या उपजीविकेसाठी प्रति कुटुंब एक हेक्‍टर शेतजमीन देण्यात यावी, सन २००७ ला लागू झालेले केंद्र सरकारचे पुनर्वसन धोरण अमलात आणावे, प्रकल्प पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी द्यावी, प्रकल्पाच्या शाळेत प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या साठी किमान २५ टक्के एवढा कोटा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात यावा, अणुऊर्जा प्रकल्पाचा सीएसआर फंड हा प्राधान्याने या परिसरातील भागात वापरण्यात यावा तसेच पोफरण व अक्करपट्टी गावांसाठी जास्त प्रमाणात निधीचा वापर व्हावा त्यात प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पांच्या नजीकच्या गावातील खाडीवरील ब्रिज तात्काळ तयार करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ३५० कुटुंबांचे पुनर्वसन करा पुनर्वसनात १२५० कुटुंबांसाठी बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचा खर्च देणे, पुनर्वसनातून वंचित राहिलेल्या किमान ३५० कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, मच्छीमार व भूमिहीन कुटुंबाला त्यांच्या उपजीविकेसाठी प्रतिकुटुंब एक हेक्‍टर शेतजमीन देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.