शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

...अन्यथा हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत ...

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काहींना पाणीच मिळत नाही. हा त्रास वर्षभर सुरू असल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल अथवा ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

एमआयडीसीकडून होणारा पुरवठा शुक्रवारी बंद होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही समस्या वर्षभर असून काहींना पाणी मिळत नसल्याकडे सुदर्शननगर निवासी संघाचे सचिव विवेक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. परिसरातील परिचय, मित्रधाम, नव जयश्री, पुरुजीत या सोसायट्यांसह अन्य सोसायट्यांना शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पाणीच येत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन महिन्यांपासून संबंधित सोसायट्यांतील रहिवासी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करत आहेत. प्रत्येकवेळी काहींना काही कारणे देऊन तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नाही. ज्या सोसायट्यांत पाण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी एमआयडीसीकडून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकून दिली जाईल व त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले होते. आरएक्स २१, आरएक्स २२ आणि आरएक्स २३ साठी जलवाहिनी टाकलेली नाही, ज्या सोसायटीसाठी जलवाहिनी टाकली त्यांनाही अद्याप पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाण्याविना रहिवाशांचे हाल सुरू असून एमआयडीसीमध्ये राहत असूनही पिण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ही शरमेची बाब असल्याचे पाटील यांनी एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

----------------------------------------

गृहसंकुलात पाणीटंचाई

कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील स्वराज नेपच्युन या गृहसंकुलातील रहिवाशांनाही वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलात दोन सेक्शन आहेत. एकामध्ये सात माळ्यांचे १० टॉवर आहेत. वर्षभरापूर्वी एक तास पाणी यायचे, ते मुबलक होते. पण काही महिन्यांपासून १० ते १५ मिनिटेच पाणी येते तेही एकदिवसाआड येत असल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

------------------------------------------------------