शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

...अन्यथा हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत ...

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काहींना पाणीच मिळत नाही. हा त्रास वर्षभर सुरू असल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल अथवा ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

एमआयडीसीकडून होणारा पुरवठा शुक्रवारी बंद होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही समस्या वर्षभर असून काहींना पाणी मिळत नसल्याकडे सुदर्शननगर निवासी संघाचे सचिव विवेक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. परिसरातील परिचय, मित्रधाम, नव जयश्री, पुरुजीत या सोसायट्यांसह अन्य सोसायट्यांना शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पाणीच येत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन महिन्यांपासून संबंधित सोसायट्यांतील रहिवासी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करत आहेत. प्रत्येकवेळी काहींना काही कारणे देऊन तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नाही. ज्या सोसायट्यांत पाण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी एमआयडीसीकडून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकून दिली जाईल व त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले होते. आरएक्स २१, आरएक्स २२ आणि आरएक्स २३ साठी जलवाहिनी टाकलेली नाही, ज्या सोसायटीसाठी जलवाहिनी टाकली त्यांनाही अद्याप पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाण्याविना रहिवाशांचे हाल सुरू असून एमआयडीसीमध्ये राहत असूनही पिण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ही शरमेची बाब असल्याचे पाटील यांनी एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

----------------------------------------

गृहसंकुलात पाणीटंचाई

कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील स्वराज नेपच्युन या गृहसंकुलातील रहिवाशांनाही वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलात दोन सेक्शन आहेत. एकामध्ये सात माळ्यांचे १० टॉवर आहेत. वर्षभरापूर्वी एक तास पाणी यायचे, ते मुबलक होते. पण काही महिन्यांपासून १० ते १५ मिनिटेच पाणी येते तेही एकदिवसाआड येत असल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

------------------------------------------------------